Mahavikas Aaghadi Press Conference:
Mahavikas Aaghadi Press Conference:  Saamtv
मुंबई/पुणे

MVA Press Conference: परतीचे दार बंद! सोडून गेलेल्यांना पुन्हा घेणार का? शरद पवार, उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात सांगितलं!

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, मुंबई|ता. १५ जून २०२४

लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुका होताच उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांची साथ सोडून गेलेले नेते परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याबाबत आता शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्वाचे विधान करत बंडखोर नेत्यांना थेट इशारा दिला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या यशानंतर उत्साह वाढलेल्या महाविकास आघाडीने आज विधानसभा निवडणुकांसाठी शड्डू ठोकला आहे. आज विधानसभा निवडणुकांबाबत बोलण्यासाठी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना थेट इशारा दिला.

"मला समजा मोदींसोबत जायचं तर मी या सगळ्या नेत्यांच्या मध्ये बसून सांगेन. जे लोक सोडून गेले त्यांना परत घेणार नाही . बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी? हे गाणं मला आठवते जेव्हा माझ्या सहकाऱ्यांना जास्त जागा मिळतात. पण त्या पारिजातला खत पाणी घालत राहणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच जे सोडून गेले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही," असे म्हणत शरद पवार यांनीही ठाकरेंच्या सुरात सूर मिसळले.

शरद पवारांचा मोदींना टोला..

"मोदींच्या जेवढ्या जास्त सभा झाल्या, तिथं आमच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाला. देशाच्या पंतप्रधान मोदी यांनी राज्यात १८ सभा झाल्या एक रोड शो झाला, तिथे आमचे उमेदवारला फायदा झाला. त्यांचे मला विशेष आभार मानावे लागतील. विधानसभेला त्यांनी अजून सभा घेतल्या त्या आमच्या फायद्याच्या ठरतील," असा टोला यावेळी शरद पवार यांनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू

Crocodile Video: चिपळुणमध्ये महाकाय मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार, नागरिकांची भीतीनं गाळण

Jayant Patil: १६ महिन्यात राज्यात ३००० हून अधिक शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, विधानसभेत जयंत पाटील संतापले

VIDEO: पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट, मंत्री भुसेंना पीक विमा केंद्र चालकांचा पुळका? विरोधकांचा हल्लाबोल

Bhushi Dam: सावधान! मान्सून पिकनिक बेतेल जीवावर; नको ते धाडस कराल जीवाला मुकाल

SCROLL FOR NEXT