Sanjay Raut Criticized Maharashtra Government Saam Digital
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: सध्याचे सरकार बैल पुत्र, त्यांचा बाप बैल, त्यांची बुद्धीही बैलाची; संजय राऊतांची सरकारवर टीका

Sanjay Raut Criticized Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारच्या गायीला राज्यमातेचा दर्जा देण्याच्या निर्णयावर संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Priya More

गायीला राज्यमातेचा दर्जा देत गोशाळांना प्रत्येक गायीमागे दररोज ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. संजय राऊत यांनी सरकारच्या या निर्णयावरून जोरदार निशाणा साधला आहे. 'सध्याचे सरकार बैल पुत्र आहेत, त्यांचा बाप बैल आहे, या सरकारचा बाप बैल असल्यामुळे यांची बुद्धीही बैलाची आहे, हे बैल बुद्धीची लोकं आहेत.', अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दुसरं काही काम नाही. आम्ही गौ मातेला मानतो. आम्हाला सांगायची काही गरज नाही पण गौ मातेच्या कत्तली ज्या भाजप शासित राज्यात होत आहेत त्यावर जरा सांगा. गाईला राज्य माता करून तुम्ही गाईचं रक्षण कसं करणार. खरं तर गाईच्या दुधाला भाव द्या, शेतकऱ्यांचा दुधाच्या भावासाठी जो संघर्ष चाललाय त्यावर चर्चा करा आणि त्यावर बोला. पण ज्यांचा बापच बैल आहे आणि ज्यांची बुद्धीच बैलाची आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा करता. निवडणुकीसाठी असे फंडे करत असतात.' अशी टीका राऊतांनी केली.

तसंच, 'दिल्लीतून काही बैल येत असतात. काही केंद्रातून फिरत असतात. महाराष्ट्राचा त्यांनी बैल बाजार केलेला आहे. गाईची पूजा आम्ही सर्व करतो त्यासाठी शासकीय आदेश काढण्याची गरज नाही. तुम्ही सावरकरांना मानता ना, तुमचे जे कोणी हिंदुत्वाचे गब्बर आहेत त्यांनी सावरकरांचं गाई विषयी जे म्हणणं आहे ते एक हिंदू म्हणून ते आधी समजून घ्या. जर तुम्ही या घोषणा केल्या असतील तर तुम्ही सावरकरांचं नाव घ्यायचं नाही. वीर सावरकर यांनी गौ मातेविषयी जे मत जी भूमिका स्पष्ट केलीये ती जे मान्य असती तर त्यांनी सावरकरांचं नाव घ्यावं. सावरकर जर आता असते तर त्यांनी यांच्या कानाखाली लगावली असती.' असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले.

अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून देखील संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, 'ते देशाचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषय बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या शाखा शाखांना भेटी देत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे. देशाच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री किती गंभीर आहेत हे यातून दिसतंय. खरं म्हणजे ते मणिपूरला जाऊन थांबायला पाहिजे. कश्मीरमध्ये जे अतिरिके हल्ले सुरू आहेत तिथे जाऊन थांबायला पाहिजे. चीन, अरुणाचलच्या सीमेवर जाऊन त्यांनी पाहणी करायला हवी. पण महाराष्ट्रातील निवडणुका आणि महाराष्ट्रात जे घटनाबाह्य सरकार त्यांनी बसवलेलं आहे त्याला संरक्षण देण्यासाठी अमित शहा इथे येत आहेत.'

तसंच, 'अमित शहा आणि मोदी महाराष्ट्रात आले की आम्हाला भीती वाटते. काही तरी इथला उद्योग राज्याबाहेर जाईल किंवा एखादा भूखंड अदानीच्या घशात जाईल त्याची तयारी करायला हे लोक येतात का? अमित शहा आज येत आहेत आणि काल दोनशे दहा एकर मिठाघराची जमीन अदानीला देण्याचा निर्णय झाला. त्या जमिनीचे मोजमाप करायला ते येत आहेत का?, की व्यवहार पाहायला? भाजपचे नेते इथे आले कि महाराष्ट्राच्या लुटीसंदर्भात काहीतरी निर्णय होईल.', असे देखील राऊत यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन; ग्रेस मार्क आणि परीक्षा पॅटर्नवरून गोंधळ

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

IND vs ENG 3rd Test: लय भारी! शानदार रवींद्र जडेजा; बनवला ७२ वर्षांत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT