Sanjay Raut on PM Narendra Modi Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : भटकती आत्मा तुमचा पिच्छा सोडणार नाही; सत्तेतून खाली खेचणारच, संजय राऊत कडाडले

Sanjay Raut on PM Narendra Modi: जोपर्यंत आम्ही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाच्या पदावरून हटवत नाहीत तोपर्यंत आमचे आत्मे शांत होणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Satish Daud

मयूर राणे, साम टीव्ही मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक दौरे केले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांचं नाव न घेता भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. मोदींच्या या टीकेला शरद पवार यांनी सोमवारी (ता. १०) प्रत्युत्तर दिलं. आत्मा हा कायम राहतो तो कुणाचाही पिच्छा सोडत नाही, असं शरद पवार म्हणाले. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केलं.

भटकती आत्मा कुणाचाही पिच्छा सोडत नाही हे शरद पवार यांनी केलेलं विधान बरोबर आहे. जोपर्यंत आम्ही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाच्या पदावरून हटवत नाहीत तोपर्यंत आमचे आत्मे शांत होणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, "केंद्र सरकारमध्ये दोन अतृप्त आत्मा आहेत. ज्याप्रकारे मंत्रिमंडळ तयार केलं कॅबिनेट मंत्रीपद दिली खातेवाटप झालं त्यानंतर अनेक अतृप्त आत्मा पाहायला मिळत आहेत. विशेषत: चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोन अतृप्त आत्म्यांचे तुम्ही समाधान करा. नरेंद्र मोदी यांना अतृप्त आत्म्यांची शांती करावी लागेल".

"भटकती आत्मा कोणाचा पिछा सोडत नाही. जोपर्यंत तुम्हाला सत्तेतून खेचणार नाही तोपर्यंत आमची आत्म अतृप्त राहतील. आमची आत्मा महाराष्ट्रात भटकत राहील" महाविकास आघाडी बाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, "महाविकास आघाडी मजबूत राहील आणि मजबूती काय असते हे आम्ही लोकसभा निवडणुकीत दाखवलं".

"विधानसभेतही आम्ही सत्ता बदलून दाखवू. आता एनडीए सरकारमध्ये आम्ही मोदींना प्रश्न विचारणार नाहीत. आम्ही चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना प्रश्न विचारणार. कारण या दोघांचा संयोग सरकार बनवण्यासाठी आहे. त्यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी बनू शकत नव्हते. नरेंद्र मोदी यांची सत्ता ही उधार सत्ता आहे", असा टोलाही राऊतांनी लगावला.

"चंद्रबाबू नायडू वाणी नितेश कुमार यांची मेहरबानी राहील तोपर्यंत ही सत्ता राहील. नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या दरम्यानच स्पष्ट केलं होतं, त्यांना हिंदू मुस्लिम वाद लावायचा आहे. मोदी यांना वाटते की देशातील मुसलमानाने त्यांना मत दिली नाहीत. त्यामुळे त्यांच्या सरकारमध्ये मुस्लिम मंत्री नाही. पण हे संविधानाच्या विरोधात आहे".

"पंतप्रधान सगळ्या जाती धर्माचा असतो. नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांना हे मंजूर आहे का? त्यांनी आपल्या कोट्यातून मुस्लिम मंत्री बनवायला हवा होता. चंद्रबाबू, नितीश कुमार आणि मांझी यांना काय मिळालं? हे सरकार टिकणार नाही. कारण त्यांना मोठे मंत्रिपद मिळाले नाही", असंही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

SCROLL FOR NEXT