Balasaheb Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Balasaheb Thackeray: 'महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचाच...' आज बाळासाहेब ठाकरेंचा १२ वा स्मृतीदिन

Balasaheb Thackeray Death Anniversary: मुंबईला आपला बालेकिल्ला बनवणारे बाळ ठाकरे अनेकदा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले. ते नेहमी त्याच्या अटींवर आणि तत्त्वांवर जगले.

Priya More

नितीश गाडगे, साम टीव्ही

तब्बल चार दशके महाराष्ट्राच्या राजकारणाला आपल्या इशाऱ्यांवर चालवणाऱ्या शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आज १२ वी पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी १७ नोव्हेंबरला २०१२ ला वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. बाळासाहेबांची प्रतिमा कट्टर हिंदू नेते अशी राहिली. बाळासाहेब बाहेरून येऊन मुंबईत स्थायिक होण्याच्या विरोधात होते.

सुमारे ४६ वर्षे बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक जीवनात राहिले. त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही किंवा कोणतेही राजकीय पद स्वीकारले नाही, तरीही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईला आपला बालेकिल्ला बनवणारे बाळ ठाकरे अनेकदा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले. ते नेहमी त्याच्या अटींवर आणि तत्त्वांवर जगले. त्यांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचे राजकारण फिरले.

बाळासाहेबांनी केला विरोध -

यूपी-बिहारमधून येऊन मुंबईत स्थायिक होणाऱ्या लोकांच्या, नेत्यांच्या आणि अभिनेत्यांच्या विरोधात बाळासाहेब होते. महाराष्ट्र फक्त मराठी माणसांचा आहे असे ते म्हणायचे. महाराष्ट्रात गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीयांच्या वाढत्या प्रभावाविरुद्ध त्यांनी आंदोलन केले. ते महाराष्ट्राचे किंग मेकर होते. सरकारमध्ये नसतानाही त्यांनी सर्व निर्णय घेतले.

व्यंगचित्रकार ते किंगमेकर प्रवास -

२३ जानेवारी १९२६ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे जन्मलेल्या बाळासाहेबांनी पत्रकार आणि व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.'द फ्री प्रेस जर्नल'मधून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये त्यांची व्यंगचित्रेही प्रसिद्ध झाली. १९६० मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली आणि 'मार्मिक' नावाने स्वतःचे राजकीय मासिक सुरू केले. वास्तविक, बाळासाहेबांवर वडिलांच्या विचारसरणीचा प्रभाव होता.

१९६६ मध्ये शिवसेना पक्ष स्थापन केला -

१९६६ मध्ये त्यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला. त्यांची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी १९८९ मध्ये 'सामना' हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मुंबईत सर्वत्र शांतता पसरली यावरून त्यांच्या राजकीय उंचीचा अंदाज लावता येतो. अंत्यसंस्काराच्या दिवशीही परिस्थिती तशीच राहिली. अंतयात्रेत दोन लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. रस्ते रिकामे होते आणि वाहनांची ये-जा नगण्य होती. तो दिवस आठवताच बाळासाहेबांच्या चाहत्यांना आजही गहिवरून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT