Eknath Khadse on Pankaja Munde, Vidhan Parishad Election News, Eknath Khadse Latest Marathi News SAAM TV
मुंबई/पुणे

मुंडे, महाजन कुटुंबानं भाजपसाठी आयुष्य खर्ची घातलं, पंकजांना तिकीट न देणे दुर्दैवी - खडसे

राज्यसभा निवडणुकीबरोबरच राज्यात विधान परिषद निवडणुकीचीही रणधुमाळी सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे

मुंबई: भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी (maharashtra legislative council election) पाच आणि अपक्ष एक अशा सहा उमेदवारांची घोषणा केली. त्याचवेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही नवखे आले की त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाते. पंकजा मुंडे यांना तिकीट न देणे खरोखरच दुर्दैवी आहे, असे खडसे म्हणाले. (Eknath Khadse Latest Marathi News)

विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत सर्वच पक्षांनी विधान परिषद निवडणुकीसाठी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपनं पंकजा मुंडे यांना उमेदवारी न देऊन मोठा धक्का दिला आहे.

याबाबत काल, बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. आम्ही पंकजांना उमेदवारी मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले, असे ते म्हणाले होते. तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर आरोप केले आहेत. दुसरीकडे एकनाथ खडसे यांनीही पंकजा यांना उमेदवारी न देण्यावरून प्रतिक्रिया दिली आहे.

मुंडे आणि महाजन या दोन्ही कुटुंबांनी आपले आयुष्य भाजपसाठी खर्ची घातले. परंतु, तरीही त्यांना डावलण्यात आले आहे. आज कोणीही नवखे आली की, त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली जात आहे. पंकजा मुंडे यांना तिकीट न देणे खरोखरच दुर्दैवी आहे, असे खडसे म्हणाले.

मुंडे आणि महाजन यांनी या सर्वांना आणि पक्षाला मोठे केले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना अशी वागणूक दिली जात आहे. विरोधी पक्षनेते खूप अनुभवी आहेत. कदाचित म्हणून त्यांनी निर्णय घेतला असेल, असा टोलाही खडसेंनी लगावला.

यापूर्वीच्या काळात समन्वयाने आणि सामोपचारानं उमेदवारी देऊन हे प्रश्न निकाली लावले जायचे. मात्र आता जाणूनबुजून घोडेबाजाराला प्राधान्य देऊन जे राजकारण केले जात आहे. ते अतिशय दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रियाही खडसे यांनी यावेळी दिली.

अडचणीत असताना शरद पवारांनी आधार दिला- खडसे

मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. आधी भाजप आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा माझा राजकीय प्रवास झाला. माझे राजकीय जीवन अडचणीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांनी मला जो आधार दिला, माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

माझे अर्धे आयुष्य हे भाजपला मोठे करण्यात गेले आणि आता पुढचे आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे करण्यात जाईल, असे खडसे म्हणाले.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT