maharashtra assembly winter session Saam tv
मुंबई/पुणे

'सोसायटी स्थापन न केल्यास थेट गुन्हा'; बिल्डरांना राज्य सरकारचा दणका

maharashtra assembly winter session : रेरा कायद्यात न येणाऱ्या इमारतींचा विकास करणाऱ्या बिल्डरांना राज्य सरकारने कायद्याच्या कचाट्यात आणून दणका दिलाय..मात्र हा कायदा नेमका काय आहे आणि त्यामुळे बिल्डरांच्या मनमानीला कसा चाप लावण्यात येणार आहे..पाहूयात....

Bharat Mohalkar

लहान इमारतींच्या बांधकामानंतर सोसायटी स्थापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बिल्डरांना आता सरकारने चांगलाच दणका दिलाय... विधानपरिषदेत महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्सबाबत सुधारणा व विधीग्राहीकरण विधेयक मंजूर केलंय... त्यामुळे आता रेरा कायद्यात येत नसलेल्या बिल्डरांनी सोसायटी स्थापन करुन न दिल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल कऱण्यास मंजूरी देण्यात आलीय...

खरंतर बिल्डरांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी 2016 मध्ये रेरा कायदा करण्यात आला... मात्र 8 पेक्षा कमी फ्लॅट असलेल्या इमारती विकसित करणारे बिल्डरांना यात सूट देण्यात आली होती.. त्यामुळे छोट्या छोट्या कारणांवरुन वाद निर्माण व्हायचे... आता त्यावर तोडगा काढण्यासाठी ग्राहक आणि गाळेधारकांनी मागणी केल्यानंतरही सोसायटी स्थापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बिल्डरांवर गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकण्यासाठीचा कायदा करण्यात आलाय...

आधी रेरा आणि आता या नव्या विधेयकाच्या माध्यमातून मनमानी करणाऱ्या आणि ग्राहकांची पिळवणूक करणाऱ्या बिल्डरांना चाप बसण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT