Breaking : नागपुरात निवडणुकीच्या आदल्या दिवशी काँग्रेसनं बदलला उमेदवार... SaamTV
मुंबई/पुणे

Breaking : नागपुरात निवडणुकीच्या आदल्या दिवशी काँग्रेसनं बदलला उमेदवार...

नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठी घडामोड घडली आहे. कॉंग्रेसनं निवडणुकीच्या आदल्या दिवशीच आपला उमेदवार बदलविला आहे. मतदानाला अवघे काही तास उरले असताना काँग्रेसनं हा निर्णय घेतला आहे.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठी घडामोड घडली आहे. कॉंग्रेसनं निवडणुकीच्या आदल्या दिवशीच आपला उमेदवार बदलविला आहे. मतदानाला अवघे काही तास उरले असताना काँग्रेसनं छोटू भोयर यांच्या (Chhotu Bhoyar) ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना काँग्रेसचा पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे अखेर काँग्रेसवरती उमेदवार बदलविण्याची नामुष्की आली असल्याच्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.

हे देखील पहा -

दरम्यान उमेदवार बदलविण्याबाबत पक्ष श्रेष्ठीनं पत्र देऊन दिली संमती घेतली असल्याचं महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पुणे येथे स्पष्ट केलं.

आज थोरात पुण्यातील भाषणामध्ये म्हणाले, 'आज लोकशाही बचाव म्हणण्याची वेळ का येते? याचा विचार करण्याची गरज असून सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आज जगात 51 व्या क्रमांका वर आला आहे. वेगळ्या पद्धतीने राजकारण सुरु झालं आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा लोकशाहीला होईल अस वाटलं होतं पण 2012 पासून या तंत्रज्ञानावापर हा राजकीय नेत्यांची बदनामी करण्यासाठी केला गेला नवी झुंडशाही निर्माण झाली, त्याचा परिणाम हा मतांवर झाला. भाजपने लोकशाही मूल्यांना तिलांजली देण्याचं काम केलं.' असल्याचा आरोपही यावेळी काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरला, भाजपच्या मंत्र्याची राजधानीत घोषणा

Maharashtra Live News Update: अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतले शैक्षणिक पालकत्वं

Maharashtra Politics: विलिनीकरणावरून वाद पेटला; अजित पवार गटाच्या आमदाराचा शरद पवार गटावर हल्लाबोल

मोठी बातमी! भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही, कारण आलं समोर

राज्यात मोठी घडामोड! भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे; पत्रावर घेतली स्वाक्षरी? नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT