Shinde Group MP Resign  Saam Tv
मुंबई/पुणे

Shinde Group MP Resign : मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का; मराठा आरक्षणासाठी खासदारांनी दिला राजीनामा, पत्र व्हायरल

Shiv Sena MP Resign: मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का; मराठा आरक्षणासाठी खासदारांनी दिला राजीनामा, पत्र व्हायरल

Satish Kengar

Shinde Group MP Resign :

एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी एक पत्र लिहून आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांचं हे राजीनाम्याचं पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाटील यांचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

हेमंत पाटील यांनी पत्रात काय लिहिलं?

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देताना पत्रात लिहिलं आहे की, ''महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशयतिव्र असून, मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकन्यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठींबा असून, आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण आहेत हेमंत पाटील?

हेमंत पाटील हे नांदेड जिल्ह्यातले शिवसेनेचे नेते आहेत. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हेमंत भाऊ या नावाने त्यांची ओळख आहे. हेमंत पाटील हे हिंगोली मतदारसंघातून १७ व्या लोकसभेचे खासदार आहेत. २००५-२०१३ साली हेमंत पाटील हे नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख होते. २०१४ साली महाराष्ट्राच्या १३व्या विधानसभेत नांदेड दक्षिणचे आमदार म्हणून ते निवडून आले. (Latest Marathi News)

२०१९ साली हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे हेमंत पाटील नंतर शिंदे गटात सामील झाले. अलीकडेच नांदेडमधील घटनेमुळे हेमंत पाटील यांचं नाव राज्यभरात चर्चेत आलं होतं. रुग्णालयाच्या डीनकडून शौचालय स्वच्छ करून घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेमुळे हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.

मनोज जरांगे पाटील यांचं सरकारला अल्टिमेटम

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''सरकारचं काही संवाद किंवा उत्तर नाही. आणखी दोन-तीन दिवस म्हणजे 30 - 31 तारखेपर्यंत वाट पाहू. त्यांना माणुसकी समजत नसेल तर मराठा समाज उत्तर देईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: राज्यात थंडी गायब, पाऊस हजर! हवामान विभागाचा नोव्हेंबरसाठी अंदाज काय? VIDEO

Maharashtra Live News Update: इस्रोच्या बाहुबली उपग्रहाचे प्रक्षेपण

Tara Sutaria: लाल इश्क...; तारा सुतारियाचा बनारसी साडीतील रॉयल लूक

India vs Australia Hobart T20I: वॉशिंग्टनची अति 'सुंदर' खेळी; टी२०मालिकेत १-१ ने बरोबरी

ऑफिसमध्ये लाइट बंद करण्यावरून वाद पेटला; सहकारी कर्मचाऱ्याने डंबल फेकून मारला, ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT