Gunaratna Sadavarte SaamTV
मुंबई/पुणे

Gunaratna Sadavarte: ठाकरे सरकार उघडं पडलं, सरकारी वकिलांची भंबेरी उडाली, म्हणून वेळ मागितली - गुणरत्न सदावर्ते

अहवालात काय आहे ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्ही महाभारतातले संजय नाही, असंही ते म्हणाले.

सुरज सावंत

ST Strike:मुंबई: एसटीच्या विलीनीकरणाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, या सुनावणीत देखील एसटीच्या विलीनीकरणाबाबत काहीही निर्णय झाला नाही. आता याप्रकरणी पुढील सुनावणी ही शुक्रवारी होणार आहे. महामंडळाच्या वकिलांनी न्यायमूर्तींकडे वेळ मागितली. त्यावर न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली असून आता पुढील सुनावणी शुक्रवार 25 फेब्रुवारीला होणार आहे (Hearing on ST merger adjourned Advocate Gunaratna Sadavarte criticize Thackeray government).

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं सरकार आज उघडं पडलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अभिप्रायवर स्वाक्षरी नव्हती. सरकारी वकिलांची भंबेरी उडाली म्हणून त्यांनी वेळ मागून घेतली. अहवालात या मागण्या त्या मागण्या मान्य केल्याचं स्पष्टीकरण दिलं गेलं. सरकारला वाईनसाठी वेळ आहे मात्र कष्टकऱ्यांसाठी नाही", असं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. अहवालात काय आहे ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्ही महाभारतातले संजय नाही, असंही ते म्हणाले.

या संपात 90 हून अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कोरोना काळात याच कर्मचाऱ्यांनी मोठी जबाबदारी निभावली आहे. न्यायालयाने त्याचा विचार करावा, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली -

22 डिसेंबरला न्यायमूर्ती वराळे यांनी एक आदेश पारीत केला होते. यात एक मागणी सोडून सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात आली होती. सरकारसोबत झालेल्या 27 बैठकीत कर्मचारी युनियनचे पदाधिकारीही होते यात पगारवाढ, घरभत्ता आणि इतर महत्वाच्या बाबींवर चर्चा सकारात्मक झाली. मात्र विलीनीकरण या एकाच मुद्यावर कर्मचारी आग्रही होते. विलीनीकरण केल्यास कर्मचार्यांना सातव्या वेतननुसार पगार द्यावा लागेल. विलीनीकरण सोडून कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

या अहवालासंदर्भात काही महत्वाच्या सूचना द्यावयाच्या असून उद्याची तारीख महामंडळाचे वकील नायडू यांनी न्यायमूर्तींकडे मागितली आहे.

सदावर्तेंच्या याचिकेवर सुनावणी

एसटीचे राज्यसरकारमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. सदावर्ते यांच्या या याचिकेवर न्यायालयाच्या आदेशानंतर त्रिसत्रीय समिती नेमून अहवाल बंद लिफाफ्यात 18 फेब्रुवारीच्या आत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार समितीने दिलेल्या वेळेच्या आत त्रिसत्रीय समिताचा अहवाल न्यायालयात बंद लिफाफ्यात सादर केला होता. याप्रकरणी पुढील सुनावनी 22 फेब्रुवारीला ठेवण्यात आली होती. त्यानुसार आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

92 हजार एसटी कर्मचार्यांचे लक्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागून होते. मात्र, आजही त्यांच्या पदरी निराशाच पडली. एसटीचे राज्यशासनामध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपाचा आज 109 वा दिवस आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashram School : आदिवासी आश्रम शाळेतील १३ विद्यार्थीना विषबाधा; पाच विद्यार्थीनी गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु

Railway OHE Poles : रेल्वे ट्रॅकजवळील पोलवर असलेल्या या आकड्यांचा अर्थ काय? जाणून घ्या नेमकी माहिती

Maharashtra Politics: लातूरमध्ये शरद पवारांना मोठा धक्का, अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ; 'कमळ' घेणार हाती

Maharashtra Live News Update : मुंबई पुणे रेल्वे मार्ग ठप्प, कर्जत व पळसधरी येथे पुण्याकडे जाणारी रेल्वे थांबवली

AC Servicing: वर्षातून किती वेळा एसीची सर्व्हिसिंग करावी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT