Ganeshotsav 2022 BJP 500 MSRTC Buses Saam TV
मुंबई/पुणे

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर; भाजपने केली मोठी घोषणा

भाजपाकडून ५०० बसेस कोकणात रवाना करण्यात आल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई भाजपाकडून ५०० बसेस कोकणात रवाना करण्यात आल्या आहेत. अंधेरी येथून आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत ३० बसेस रवाना झाल्या. विशेष बाब म्हणजे या बसमधून तब्बल २० हजाराहून अधिक प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे. अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली. (Toll Free Pass For Ganpati 2022)

गेली दोन वर्ष कोरोनाचं संकट असल्याने मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यासाठी अनेक कोकणवासी गावी जाणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी मुंबई भाजपाच्या वतीने ५०० बसेस शनिवारी कोकणात रवाना झाल्या. अंधेरी येथून आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ३० बसेस रवाना झाल्या. (Ganapati Festival 2022)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून भाजपाचे माजी मुंबई अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अतुल भातखळकर, आमदार नितेश राणे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेता आमदार प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, महामंत्री संजय उपाध्याय यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT