अपघातप्रकरणी NHAI व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा सागर आव्हाड
मुंबई/पुणे

अपघातप्रकरणी NHAI व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मनसे च्या रस्ते-आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष जगदीश वाल्हेकर यांची मागणी

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ गेल्या तीन दिवसांपासून भीषण अपघात होऊन काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वारंवार अपघात होऊन आणि पाठपुरावा करूनही वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक सुविधा पुरवल्या जात नाहीत. या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआयए) व रिलायन्स इन्फ्रा यांचा हलगर्जीपणा जबाबदार आहे.

हे देखील पहा :

त्यांच्यावर या अपघाताप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) रस्ते-आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष जगदीश वाल्हेकर यांनी केली आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन वाल्हेकर यांनी रविवारी सिंहगड रोड पोलीस स्टेशनला दिले.

पोलीस अधिकाऱ्यांनी हे निवेदन स्वीकारत दोषींकर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष प्रवीण आग्रे, ऍड. सुनील कोरपडे, सूर्यकांत कोडीतकर, राहुल वाळुंजकर, आकाश साळुंके, ओंकार पिसाळ, मुथप्पा तारापुरे आदी मनसे सैनिक उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT