BJP And BMC Saam TV
मुंबई/पुणे

BMC Election: मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटचीच समजून लढा; फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला

'25 वर्ष मुंबई महापालिकेत ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना आता खाली खेचायची वेळ आली आहे.'

Jagdish Patil

सुशांत सावंत -

मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) आपल्यासाठी महत्त्वाची आहे, ही निवडणूक शेवटची आहे असे समजा आणि पुर्ण ताकदीने लढा असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आजच्या दिला असल्याचं समजतं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत आल्यानंतर शाह यांनी 'लालबागचा राजाचं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेतेही हजर होते.

गणेश दर्शनानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर एक बैठक घेण्यात आली या बैठकीत अमित शाह यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. तर यावेळी फडणवीस यांनी देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुंबई महापालिका जिकंण्यासाठी प्राणपणाला लावून लढण्याचा आदेश दिल्याचं समजतं आहे.

पाहा व्हिडीओ -

'मुंबई महापालिकेची निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे, ही निवडणूक शेवटची आहे असेच समजा आणि पुर्ण ताकदीने लढाई लढा.' असा सल्ला फडणवीस कार्यत्यांना दिल्याचं समजतं आहे. त्यामुळे भाजप (BJP) मुंबई पालिकेसाठी सज्ज झाली असून कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईवर भाजपचा झेंडा फडकवा असाच संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

त्यामुळे येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा टोकाचा संघर्ष होणार यात काही शंका नाही. एकीकडे फडणवीसांनी पालिका जिंकण्याचा निर्धार केला आहे तर अमित शहा यांनी या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

शिवसेनेने युती तोडली -

'उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला, 2014 साली दोन जागांसाठी शिवसेनेनं युती तोडली, राजकारणात जो धोका देतो तो कधीच यशस्वी होत नाही. शिवसेना स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाली. आता एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. आणि ती आपल्या सोबत असल्याचं वक्तव्य शाह यांनी केलं आहे.

भ्रष्टाचाऱ्यांना खाली खेचायची वेळ -

अमित शाह आणि फडणवीस यांच्यासह मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील सेनेवर टीका केली, '25 वर्ष मुंबई महापालिकेत ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना आता खाली खेचायची वेळ आली आहे. आता रस्त्यावर उतरू आणि पालिकेत सत्ता मिळवू, आपल्याला आता मुंबईकरासाठी सत्ता मिळवायला हवी असं वक्तव्य शेलार यांनी केलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulja Bhawani : तुळजाभवानी देवीचे १ ऑगस्टपासून दर्शन बंद; भाविकांसाठी केवळ मुखदर्शन

Maharashtra Politics : जुन्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? भाजपमधील इनकमिंगवरून माजी आमदाराने सांगितली मनातील सल

Ind vs Eng Test : इंग्लंडला मोठा धक्का; बेन स्टोक्ससह हुकमी गोलंदाज ओव्हल कसोटीतून बाहेर, प्लेइंग ११ मध्ये ४ बदल

Maharashtra Live News Update: राष्ट्रीय समाज पक्षाची शुक्रवारी पुण्यात बैठक

Maharashtra Politics: राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत आमनेसामने; एकाच सोफ्यावर बसले पण नजरानजर टाळली|VIDEO

SCROLL FOR NEXT