Ravikant Tupkar News Saam Tv
मुंबई/पुणे

Ravikant Tupkar Hunger Strike : उभंही राहता येत नव्हतं, दोन जणांची घेतली मदत; तुपकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; काय झाली चर्चा?

Ravikant Tupkar News : कापसाला व सोयाबीनला योग्य हमी भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न सुटावेत यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मोठं आंदोलन केलं होतं. त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं.

Satish Kengar

Ravikant Tupkar Hunger Strike :

कापसाला व सोयाबीनला योग्य हमी भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न सुटावेत यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मोठं आंदोलन केलं होतं. त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. यातच आज त्यांनी मुंबईत सह्यादी अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि आपलं उपोषण मागे घेतलं आहे.

अन्नत्याग आंदोलनाचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर दिसून आला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांना खूप अशक्तपणा जाणवत असल्याचं दिसून आलं. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बिस्कीट घेत उपोषण मागे घेतलं असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले आहेत की, ''तेल आणि कापूस आयात करू नका, असं आम्ही राज्य सरकारला सांगितलं आहे. आमच्यासमोर वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांना कॉल करण्यात आला. त्यांनी दिल्लीत आम्हाला बैठकीसाठी बोलावले आहे.'' (Latest Marathi News)

'आमच्या 70-80 टक्के मागण्या मान्य'

त्यांनी राज्य सरकाराला आपली मागणी सांगताना म्हटलं आहे की, ''पीक विम्याची रक्कम या महिन्याच्या अखेरपर्यंत जमा झाली पाहिजे. पीक विमा यासाठी शेतकऱ्यांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्वस्त केले आहे. आमच्या 70-80 टक्क्यांपर्यंत मागण्या मान्य केल्या आहेत. पण आम्ही गप्प बसणार नाही. येत्या 15 दिवसांत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि सरकारने 15 दिवसांत स्वतःचा शब्द पाळला नाही तर, मात्र आम्ही नागपुरात जाऊन अधिवेशन सुरू असताना विधानसभेला घेराव घालणार.''

तुपकर पुढे म्हणाले की, ''आमचं सरकारला सांगणे आहे की शेतकऱ्यांना मदत करताना हेक्टर आणि एकरची मर्यादा लावू नका. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करा.'' ते म्हणाले, ''कृषिमंत्री आजच्या बैठकीत का नव्हते माहीत नाही. पण ते आजारी होते का ? कुठे होते, मला माहित नाही. पण जर कृषिमंत्री दुसऱ्या कुठल्या दौऱ्यासाठी व्यस्त असल्याने शेतीच्या प्रश्नाकडे जर त्यांनी कानाडोळा केला असेल तर, मात्र आम्ही त्यांचा सुद्धा समाचार घेऊ.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT