Devendra Fadnavis And Uddhav thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

'संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर...'; उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या पहिल्या शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त आज शिवसेनेची स्वाभिमान सभा संपन्न झाली. या सभेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) उपस्थित शेकडो शिवसैनिकांना संबोधित केले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यासहित इतर मुद्द्यांवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या औरंगाबादमधील जल आक्रोश मोर्चावरही सडकून टीका केली. आता उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि फडणवीसांवर टीका केल्यानंतर भारतीय जनता पक्षानंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra Politics News)

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही.पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही. त्यांनी दुसर्‍यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि...!. माझे पुन्हा सवाल आहेत,शेतकर्‍यांना मदत केव्हा करणार?. पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?'.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, असो,संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना... काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती.पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे'.

दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. 'आता चिरडण्याची क्षमता मुख्यमंत्र्यांची राहिली नाही. पाऊस तोंडांवर आहे, डास आधी होणार नाही याची काळजी घ्या. मग चिरडण्याची भाषा केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांसाठी हिंदुत्व आणि सत्तांतर आता कालबाह्य विषय झाले आहेत. त्यामुळे नामांतरावर ते असं बोलत आहेत. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं जातं यासाठी वेळ द्यावा लागतो. प्रश्न सोडवावे लागतात.केंद्र सरकारची जल जीवन योजना राबवण्यात आली आहे, जल जीवन निधी का वापरला नाही याचा उत्तर द्यावे. मग पाण्यावर बोला, अशी टीका प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT