छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी श्रद्धांजली वाहण्यावरून राजकीय वाद पेटला आहे. या श्रद्धांजली वाहण्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिल्याने वाद पेटलाय. त्यावरून सत्ताधारी भाजपने काँग्रेसवर टीका केली. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महात्मा गांधी यांना जयंतीदिनी श्रद्धांजली वाहिल्याची पोस्ट काँग्रेसने समोर आणली आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिल्याने सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. राहुल गांधी यांच्या ट्विटवरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. निलेश राणे म्हणाले, 'राहुल गांधी यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. ते चीनमध्ये असल्यासारखं वक्तव्य करताहेत. ते परदेशात गेले, तरी भारताची बदनामी करतात. राहुल गांधी भारतीय नाहीत. केवळ त्यांचा पासपोर्ट आहे. त्यांना आपली संस्कृती माहिती नाही. त्यांना साधं जयंती आणि श्रद्धांजलीचा अर्थ कळत नाही'.
'नेता म्हणायचा एकही गुण राहुल गांधी त्यांच्याकडे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय. त्यामुळे काँग्रेस पक्षाने माफी मागितली पाहिजे. राहुल गांधींनी ही माफी मागितली पाहिजे', असे ते म्हणाले.
सत्ताधाऱ्यांच्या टीकेनंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, 'राहुल गांधी यांच्या ट्विटवरून भाजपने टीका करणे, त्यांचा हा दुटप्पीपणा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटरमध्ये तसा उल्लेख आहे. त्यामुळे ते फक्त राहुल गांधी यांची बदनामी भाजप करत आहेत'. काँग्रेसने पलटवार केल्यानंतर भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.