Breaking News: ठरलं! 'या' तारखेपासून राज्यातील कॉलेज होणार सुरु Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking News: ठरलं! 'या' तारखेपासून राज्यातील कॉलेज होणार सुरु

कॉलेज सुरू करण्या संदर्भात फाईल मुख्य सचिवांन कडे गेली होती.

वृत्तसंस्था

मुंबई: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यत बंद असलेले कॉलेज सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यतील वरीष्ठ महाविद्यालयने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम पाळणे गरजेचे आहे. याअगोदर राज्यातील 8 ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यात आले होते.

दरम्यान सकाळी माध्यमांशी बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माहिती दिली होती की, कॉलेज सुरू करण्या संदर्भात फाईल मुख्य सचिवांन कडे गेली आहे. काल मिस कम्युनिकेशन झालं असल्याची कबूली उदय सामंत यांनी दिली होती. काल काही अॅटोनॉमस कॉलेज ने आपली कॉलेज सुरू केली आहेत. आज आम्ही कॉलेज सुरू करण्यासंदर्भात सगळे निर्णय घेऊ अशी माहिती उदय सामंत यांनी दिली होती.

कालच्या अजीत पवारांच्या निर्णयावरुन सरकार मध्ये ताळमेळ आहे का नाही असा प्रश्न उभा राहिला होता. त्यावर उत्तर देताना सामंत म्हणाले ''आमच्यात समन्वय आहे. अजित पवार साहेबांचं माझ्याशी बोलणं झालं आहे. 11 वी आणि 12 वी चे कॉलेज सुरू झाले आहेत. आत्ता आम्ही पदवीधर विद्यार्थ्यांनसाठी कॉलेज सुरू करणार आहोत''.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोणत्याही प्रकारची गुंडागर्दीत नको पारदर्शक कारभार करणारी नगरपालिका हवी - देवेंद्र फडणवीस

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

SCROLL FOR NEXT