Eknath shinde  Saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde: शिवसेना आमदारांनी का केला उठाव?; मोदींनी कोणता मंत्र दिला?, एकनाथ शिंदेंनी सर्वकाही सांगितलं

Eknath Shinde Latest News in Marathi: शिवसेनेच्या आमदारांना महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करणे कठीण झाले होते. शिवसेना-भाजपने एकत्रच मागील विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं, असं सांगून आमदारांनी उठाव का केला याची सविस्तर माहिती दिली.

Nandkumar Joshi

मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सहकारी आमदारांचा 'उठाव' आणि भाजपला दिलेल्या पाठिंब्याबाबत मोठं विधान केलं आहे. शिवसेनेच्या आमदारांनी उठाव का केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना कोणता 'मंत्र' दिला याबाबत त्यांनी एएनआयला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. ( Eknath Shinde Latest News in Marathi)

बंडाच्या काळातील अनेक घटना-घडामोडींवर प्रकाश टाकला. शिवसेनेच्या आमदारांना महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) काम करणे कठीण झाले होते. शिवसेना-भाजपने एकत्रच मागील विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळे जेव्हा कधी हिंदुत्वाचा मुद्दा आला, दाऊदचा मुद्दा आला, मुंबईतील बॉम्बस्फोटाच्या घटनेचा मुद्दा आला, तसेच इतर विषय यायचे त्यावेळी आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नव्हतो. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची विचारसरणी सोडली होती, त्यामुळे आम्हाला हिंदुत्वाचा झेंडा हाती घ्यावा लागला, असे एकनाथ शिंदे यांनी या मुलाखतीत सांगितले.

एकनाथ शिंदे म्हणाले, 'आमच्या सरकारला भाजपने (Shivsena-BJP) दिलेल्या पाठिंब्यावरून स्पष्ट होते की, पक्ष केवळ सत्तेसाठी नाही तर विचारसरणीसाठीही आहे. भाजप सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकतो असं जनतेला वाटलं होतं. पण त्यांनी देशातील जनतेला दाखवून दिलं की, या ५० आमदारांनी एक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. हिंदुत्व हा त्यांचा अजेंडा आहे. विकासाचा अजेंडा आहे. त्याचं समर्थन केलं पाहिजे. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. आमच्यापेक्षा अधिक आमदार असतानाही भाजपने आम्हाला पाठिंबा दिला. मुख्यमंत्रिपदासाठी आम्हाला पाठिंबा दिला.'

राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जा, राज्याची प्रगती करा, असे आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सांगितल्याचेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. राज्याला विकासाकडे घेऊन जा. विकासकामे करा. पंतप्रधानांनी आम्हाला आणि विकासकामे करण्यासाठी केंद्राचा पूर्ण पाठिंबा असेल, असे आश्वासनही मोदींनी आम्हाला दिल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. ही एक मोठी गोष्ट आहे की केंद्र सरकार आमच्यासोबत आहे. आम्हीही काहीही चुकीचे केलेले नाही. निवडणुकांआधी भाजप आणि शिवसेना यांची युती होती. आम्ही त्याच पक्षासोबत युती केली आहे, असंही ते म्हणाले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे, जे विचार आहेत, त्यांची जी भूमिका आहे ती पुढे नेण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला. आमचे जवळपास ५० आमदार जर एकाचवेळी अशी भूमिका घेतात तर त्यामागे नक्कीच मोठे कारण आहे. यावर विचार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मोठ्या मनाचे नेते आहेत. ते उपमुख्यमंत्री झाले. जेव्हा पक्षादेश येतो त्यावेळी पक्षाचा आदेश मानतात. त्यांनी माझ्यासारख्याला, बाळासाहेबांच्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्रिपदी बसवलं. मी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढील विधानसभा निवडणुकीत २०० जागांवर विजय मिळवू असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर १७० आमदार आमच्या युतीमध्ये आहेत. केवळ ३० उरलेले आहेत. आम्ही २०० हून अधिक जागांवर विजय मिळवू शकतो, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT