Sugarcane factory Saam TV
मुंबई/पुणे

'या' तारखेपर्यंत राज्यातील संपुर्ण ऊसाचं गाळप होणार; साखर आयुक्तांची माहिती

'महाराष्ट्रामध्ये सध्या जवळपास २५ लाख टन ऊस उभा असून उसाचा हंगाम संपायला आणखी अवधी आहे.'

विश्वभूषण लिमये

पुणे : महाराष्ट्रामध्ये सध्या जवळपास २५ लाख टन ऊस (Sugarcane) उभा असून उसाचा हंगाम संपायला आणखी अवधी आहे. १० जूनपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण ऊस गाळला जाईल, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांनी आज केलं आहे.

बीड जिल्ह्यात (Beed District) तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने एका ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने ऊस पेटवून देत, ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिरीक्त ऊसाचा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे. तर तोंडावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यामुळे आता कारखाने बंद झाले तर करायचं काय असा प्रश्न देखील शेतकऱ्याला सतावत असताना साखर आयुक्तांनी मात्र सर्व ऊसाचे गाळप केलं जाईल असं आश्वासन दिलं आहे.

हे देखील पाहा -

महाराष्ट्रातील २०० पैकी ११० कारखाने (Sugarcane Factory) सध्या बंद झालेले आहेत. मात्र, उरलेला ऊस गाळण्यासाठी ९० कारखाने कार्यरत आहेत. त्यामुळे येत्या १० जूनपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण ऊस गाळला जाईल अशी माहिती साखर आयुक्तांनी दिली आहे. महाराष्ट्रात जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस गाळप होणे बाकी आहे त्यासाठी अनुक्रमे सोलापूर, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यामध्ये गाळपाची सोय करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT