Atul Bhatkhalkar Saam Tv
मुंबई/पुणे

पत्राचाळ प्रकरण : प्रविण राऊत यांनी 95 कोटी घेतले, अतुल भातखळकरांचा आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अंमलबजावणी संचालयानं म्हणजेच ईडीनं (Enforcement directorate) पत्राचाळ गैरव्यवहाराचे (Patrachawl case) आरोप असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांची संपत्ती ५ एप्रिलला जप्त केली. तसंच राऊत यांची अलिबाग येथील मालमत्ता, दादर येथील फ्लॅटही ईडीनं जप्त केला. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची मालमत्तेवर टाच आणल्याची माहिती समोर आली. या प्रकरणावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul bhatkhalkar) यांनी प्रतिक्रिया दिलीय. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात (Pravin raut) प्रविण राऊत यांनी 95 कोटी घेतले. तर ५५ लाख संजय राऊत यांच्या खात्यात आले. असा आरोप भातखळकर यांनी माध्यमांशी बोलताना राऊत कुटुंबावर केला आहे.

तसंच भातखळकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, शिवसेनेने मराठी माणसाच्या नावावर भावनिक राजकारण केले आणि स्वत:ची घरं भरली. पत्राचाळीचा विकास रखडला आहे. प्रविण राऊत सध्या तुरुंगात आहेत. पत्राचाळीत विकासकांनी चार-चार लोकांना एफएसआय विकला आणि जॉनी जोसेफ कमीटीच्या शिफारशीनुसार कंत्राट दिले. सेल कंपोनेट इतरांना विकला. 672 मराठी माणसाला घर खाली करायला लावली. ब्लॅक लिस्टमध्ये असलेल्या रेलीकरोनला कंत्राट दिला. तसंच 100 फरजी लोकांना घर विकली. त्यामुळे ईडीला माझी मागणी आहे की, या 100 लोकांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. मुंबईमध्ये मेहुण्यांचं खूप राज्य आहे. असा टोलाही भातखळकर यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT