Bhim Army  सुमित सावंत
मुंबई/पुणे

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय अनधिकृत, पालिकेने ते तोडावे - भीम आर्मी

कारवाई न झाल्यास पालिकेत आंदोलन करू असा इशारा यावेळी कांबळे यांनी दिला आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - नरिमन पॉईंट येथे भाजपचे (BJP) महाराष्ट्र प्रदेश कार्यालय आहे. हे कार्यालय बेकायदेशीर रित्या बांधण्यात आले आहे. त्यामुळे हे कार्यालय अनधिकृत असल्याने त्यावर मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) कठोर कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मी (Bhim Army) संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास पालिकेत आंदोलन करू असा इशारा यावेळी कांबळे यांनी दिला आहे.

हे देखील पहा -

मंत्रालयाजवळ भाजपचे कार्यालय आहे. हे कार्यालय बेकायदेशीर पणे उभारण्यात आले आहे. त्यामुळे त्या कार्यालयावर कारवाई करावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. मुंबईत अनेक झोपड्यांवर कारवाई केली जाते मग भाजपाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई का केली जात नाही, भाजपच्या अनधिकृत बांधकामाला पालिकेने संरक्षण दिले आहे का असा प्रश्नही कांबळे यांनी उपस्थित केला आहे. भाजपाचे कार्यालय बेकायदेशीर रित्या बांधण्यात आले आहे.

त्यामुळे यावर कारवाई करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव तसेच पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र देखील लिहिले आहे. पालिकेने हे बेकायदेशीर बांधकाम त्वरित तोडावे अशी मागणी देखील या पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती कांबळे यांनी यावेळी दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT