Kalyan BJP Politics Saam Tv News
मुंबई/पुणे

कल्याणमध्ये काँग्रेसला खिंडार! बडे नेते भाजपवासी; प्रदेशाध्यक्षांनी दिले मोठे संकेत

Bjp grows stronger in kalyan: कल्याणमध्ये काँग्रेसला झटका! अनेक पदाधिकारी भाजपमध्ये, स्वबळावर लढण्याचे संकेत. रविंद्र चव्हाणांचा इशारा.

Bhagyashree Kamble

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. प्रत्येक नेते आणि पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. सध्या राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशातच कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसमधील काही पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुकी स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कल्याणमध्ये भाजपची अधिक ताकद वाढली आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या विधानातून राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे संकेत दिले आहेत.

पक्षप्रवेश सोहळ्यावेळी रविंद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. रविंद्र चव्हाण म्हणाले, 'कल्याण डोंबिवलीला लागलेला विकासाचा ग्रहण दूर करायचा आहे. हा ग्रहण दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा महापौर येणे अत्यंत गरजेचं आहे', असं रविंद्र चव्हाण म्हणाले आहेत. यासह कल्याण डोंबिवली भाजपमय करायचा आहे, त्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागा, असंही रविंद्र चव्हाण म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : गुरुवारी त्रयोदशीला उजळणार, वाचा राशीभविष्य

Harshvardhan jadhav : रावसाहेब दानवे यांच्या जावयाला एका वर्षांचा तुरुंगवास, कारण काय? VIDEO

Hindustani Bhau: कोल्हापूरकरांना हिंदुस्तानी भाऊच्या शिव्या;भाऊला 'वनतारा'चा पुळका

High Court: फ्लॅट आकारनुसार द्यावा लागेल मेंटेनन्स; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Dada Bhuse: शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक

SCROLL FOR NEXT