Ambernath News Saam Digital
मुंबई/पुणे

Ambernath News : आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा संघर्ष अटळ! शिवसेनेचा इशारा

Sandeep Gawade

अजय दुधाणे, साम टीव्ही प्रतिनिधी

अंबरनाथ शहरात सुरू असलेला अनियमित पाणीपुरवठा आणि वीजेचा लपंडाव यावर आठ दिवसात तोडगा काढा, अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा थेट इशारा अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिला आहे. यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत आठ दिवसांची मुदत मागीतली आहे. त्यानंतर मात्र या दोन्ही विभागांविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं अरविंद वाळेकर यांनी म्हटलं आहे.

अंबरनाथ शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असून पाण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रासले आहेत. याबाबत शिवसेनेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला विचारलं असता त्यांनी, महावितरणकडे बोट दाखवत वीजपुरवठा नियमित नसल्याचं कारण दिलं. त्यामुळेच पाणीपुरवठ्याला फटका बसत असल्याचं कारण दिलं होतं.

त्यामुळे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी या दोन्ही विभागांना आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांची मुदत मागितली असून त्यात वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं आहे. आठ दिवसात ही समस्या मार्गी न लागल्यास संघर्ष अटळ असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' कधीच बंद होणार नाही, PM मोदींसमोर मुख्यमंत्र्यांनी दिली गॅरंटी

Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

SCROLL FOR NEXT