Ajit Pawar  saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : आगामी काळात अजित पवार मुख्यमंत्री होतील; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचं मोठं राजकीय विधान

amol mitkari on ajit pawar : आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्यावर मोठं विधान केलं आहे. पुढील काळात अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. महायुतीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. पण अजित पवार नव्हते. या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पुढील निवडणुकीनंतर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असे वेध लागले आहेत. आगामी काळात अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं विधानच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. अमोल मिटकरी यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

बारामतीत अजित पवार यांचा नागरी सत्कार समारंभ कार्यक्रम होत आहे. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

या कार्यक्रमात अमोल मिटकरी म्हणाले, 'अनेकांना पालकमंत्री कधी होणार, असे अनेकांना प्रश्न पडले आहेत. माझ्यासाठी आज सुवर्णक्षण आहे. बारामतीमधील लोकांनी भरभरून आशीर्वाद दिला. अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं फडणवीस बोलले आहेत. अजित पवार मुख्यमंत्री होतील. आगामी काळात महायुतीमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होतील'. आम्ही कोणाचा तिरस्कार करणार नाही. दादांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आणि यश मिळालं. अनेक लोक अजितदादांना भेटून गेले. अजित पवार हे भगवान शंकरासारखे आहेत. सगळ्यांना समजून घेतात'.

'अजितदादा पहाटे उठून कामाला लागतात. जितेंद्र आव्हाड हे रात्री २ वाजता झोपतात. त्यानंतर दुपारी २ वाजता उठतात. ते झोपेत ट्विट करतात. अजितदादांवर अनेकदा टीका झाली. त्यांनी सहन केली. त्यांनी २०१९ साली महिलांना अधिक संधी दिली. आताच ब्रह्मादेवाकडे पुढील जन्माची बुकिंग करावं, पुढचा जन्म बारामतीमध्ये व्हावा, असे मिटकरी म्हणाले.

'भाजपमध्ये अनेकांना मंत्रिपद दिलं नाही. ते नाराज नाहीत. सेनेमध्ये अनेकांना मंत्रिपद नाहीत, ते नाराज नाहीत. मग छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिला नाही तर जोडे मारले हे चूक आहे. मागे किती बोला, दादा समोर दिसले की सलाम करतात, असे मिटकरींनी सांगितले.

यावेळी मिटकरी यांनी परभणी आणि बीडच्या घटनेवरही भाष्य केलं. 'अजित पवारांनी दिलेला शब्द खरा केला आहे. अनेक निवडणुकीत तो खरा केला. परभणीत घटना घडली. त्यावर अजित पवारांनी शब्द दिला आहे. बीडच्या मस्साजोगमधील कुटुंबाला सांत्वनपर भेट घेतली. त्यांनाही आधार दिला, असे मिटकरी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे यांची चौकशी झाली पाहिजे, लक्ष्मण हाके यांची मागणी

Manoj Jarange Live : भाऊबि‍जेला कट रचला, मनोज जरांगेंनी वाल्मिक कराड, पंकजा मुंडेंचेही नाव घेतलं, नेमकं काय काय म्हणाले?

Manoj Jarange: हत्येचा कट कसा रचला गेला? मनोज जरांगेंनी घटनाक्रमच सांगितला; बड्या नेत्याचं नाव केलं उघड

Black Pav Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी स्पेशल ब्लॅक पावभाजी; वाचा सोपी रेसिपी

Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना- विकी झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

SCROLL FOR NEXT