Mumbai Fire News: काल, सोमवारी रात्री मुंबईतील चेंबूर परिसरातील शिव आशिष कॉम्प्लेक्सच्या तळघरात आग (Fire) लागली होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. (Mumbai Latest News)
तळघरात असलेल्या बाटा फुटवेअर कंपनीचा लाखोंचा माल ठेवण्यात आला होता, तो जळून राख झाला. रात्रीची वेळ असल्याने आणि दुकाने बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग कशी लागली याचा शोध अग्निशमन दल (Fire Brigade) आणि स्थानिक पोलिसांकडून सुरू असून, प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.