ठाकरे सरकार धावलं मदतीला; Assam अडकलेल्या महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थ्यांची सुटका Saam Tv
मुंबई/पुणे

ठाकरे सरकार धावलं मदतीला; आसाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थ्यांची सुटका

आसाम रायफल बटालियनच्या परीक्षेकरिता आसाममध्ये गेलेल्या महाराष्ट्रामधील ६० ते ७० विद्यार्थ्यांना सक्तीचे क्वारंटाईन करण्यात आले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : आसाम रायफल बटालियनच्या परीक्षेकरिता (Exam) आसाममध्ये (Assam) गेलेल्या महाराष्ट्रामधील (Maharashtra) ६० ते ७० विद्यार्थ्यांना (students) सक्तीचे क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले होते. त्यानंतर राज्य प्रशासनाने (State Administration) तत्काळ त्याची दखल घेत विद्यार्थ्यांना परत आणण्याकरिता प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान, आसाम मध्ये अडकलेल्या सर्व मुलांची अखेर सुटका करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

रुग्णालयामधून (hospital) सर्व मुलांना आसाम सरकारने (government) काल संध्याकाळी सोडले असल्याची प्रशासनाने दिली आहे. सर्व मुले सध्या न्यू हॉकलॉगच्या (hacklog) रेल्वे स्टेशनवरून (Railways) गुवाहाटीला जाणार आहेत. तेथून ते आज रेल्वेने महाराष्ट्राकडे (Maharashtra) येणाऱ्या ट्रेनमध्ये बसणार आहेत.

कोल्हापूर (Kolhapur) आणि पुणे (Pune) येथील ६० विद्यार्थी इलेव्हन आसाम रायफल बटालियनच्या परीक्षेकरिता आसामला गेले होते. ट्रेडमॅनपदाच्या ६ जागांसाठी १२ ते १८ जानेवारी दरम्यान ही परीक्षा होणार होती. या परीक्षेकरिता हे सर्व विद्यार्थी १ ते ७ जानेवारी दरम्यान आसामला पोहोचले होते. आसाम येथे पोहोचल्यावर त्यांची कोरोना चाचणी न करता त्यांना थेट QUARANTIN करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे (Corona) ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT