बारावीचा निकाल उशीरा लागणार शिक्षकांनी मागितला वेळ Saam Tv
मुंबई/पुणे

बारावीचा निकाल उशीरा लागणार शिक्षकांनी मागितला वेळ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषयनिहाय गुण भरण्याची मुदत येणाऱ्या २ दिवसांत संपणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्र Maharashtra राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषयनिहाय गुण भरण्याची मुदत येणाऱ्या २ दिवसांत संपणार आहे. परंतु, हे काळ अपुरा असल्यामुळे शिक्षकांना teacher विद्यार्थ्यांचे students गुण भरण्याकरिता ४ दिवसांचा कालावधी वाढवून द्यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.

हे देखील पहा-

राज्य सरकारने State Government शिक्षकांना १२ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि गुण तक्ते सादरी करणकरिता ७ दिवस तर, वर्ग शिक्षकांना परीक्षण आणि नियमनाकरिता ९ दिवस देण्यात आले होते. याची मुदत संपली असून, आजून काही ठिकाणी हे काम अपूर्ण आहे. मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषय निहाय गुण भरण्याची मुदत संपत आली आहे. मंडळाची संगणकीय प्रणाली यानंतर बंद होणार असल्याचे, कळवण्यात आले आहे.

परंतु, यादरम्यान संगणकीय प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती देत असताना शिक्षकांनी पावसामुळे Rain वीज पुरवठा खंडित होणे, इंटरनेटची Internet सुविधा विस्कळित होणे अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. १२ वीचे शिक्षक अत्यंत परिश्रमपूर्वक हे काम करत आहेत, पण मुसळधार पावसाने इंटरनेट, वीज खंडित होत आहे. यामुळे सरकारने संगणकीय प्रणाली मध्ये विषय निहाय गुण देण्याकरिता दिलेल्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी मुंबई Mumbai कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस मुकुंद आंधळकर यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT