Ahmednagar News Sachin Jadhav
महाराष्ट्र

Ahmednagar News: अंत्यसंस्कार झालेले ३ मृतदेह पुन्हा बाहेर काढले; यवत हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट

अंत्यविधी केलेले सात पैकी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Ruchika Jadhav

Yavat News Update: अहमदनगरच्या यवत हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. या घटनेत एकाच दिवशी भीमा नदी पात्रात ७ मृतदेह सापडले. हे मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अंत्यविधी केलेले सात पैकी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा या भयावह घटनेला वेगळे वळण लागल्याचे दिसत आहे. ( Ahmednagar Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयातील एका टीमने हे अंत्याविधी झालेले मृतदेह बाहेर काढले आहेत. तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करायचे असल्याने तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

शवविच्छेदनासाठी तिन्ही मृतदेह पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल केले गेले आहेत. रुग्णालयाचे एक विशेष पथक या तिन्ही व्यक्तींचे शवविच्छेदन करणार आहे. या सात जणांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांचे एकूण ५ पथक या घटनेचा छडा लावण्यासाठी कार्यरत आहेत.

आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात अशोक कल्याण पवार, शाम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार, कांताबाई सर्जेराव जाधव यांच्यावर संशय असल्याने त्यांना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT