संजय राठोड
यवतमाळ : अंगणवाडीतील बालकांना दिला जात असलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील अंगणवाडीत वय वर्ष सात महिने ते तीन वर्ष, तसेच गरोदर व स्तनदा माता यांना दिल्या जाणारा पाकीट बंद पोषण आहार निष्कृट दर्जाचा असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. सदर कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन म्हणून पोषण आहार दिला जात असतो. तर अंगणवाडीला बालकांना तसेच गरोदर महिला व स्तनदा मातांना देखील पोषण आहारचा पुरवठा करण्यात येत असतो. पौष्टिक घटक असलेल्या पोषण आहाराच्या बंद पाकिटांचा पुरवठा करण्यासाठी कंत्राट दिलेले आहे. मात्र या कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचा पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येत असल्याच्या तक्रारी नेहमीच समोर आल्या आहेत. मात्र या कंत्राटदारांवर कोणत्याही प्रकरणी कारवाई करण्यात येत नाही.
पोषण आहाराच्या पाकिटातून दुर्गंधी
शासनाच्या वतीने पाकीट बंद मूग डाळ, तांदूळ पाकीट, तूर डाळ, मल्टीग्रेन गोड पिठाचा शिरा ही घटक दिली जातात. मात्र या पोषण आहारातून दुर्गंधी येत असल्यााचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला असून चांगल्या दर्जाचे पोषण आहार वाटप करण्याची मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापूरे आणि देवा शिवरामवार यांनी केली आहे
ठेकेदारावर कारवाईची मागणी
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निकृष्ट दर्जाचा पोषण आहार करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर मनसेने आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत मनसेकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. यामुळे प्रशासन आता काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.