यवतमाळ : काठोडा येथील काही महिलांसह नदीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका १४ वर्षीय मुलीचा नदीत पडून मृत्यू झाला. हंडाभर पाण्यासाठी पोरीचा जीव गेल्याच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनं 'हर घर जल' योजनेची चिरफाड केली आहे. एरवी बाष्कळ मुद्द्यांवर दिवसेंदिवस काथ्याकूट करणाऱ्या राजकीय नेत्यांनी मुलभूत मुद्द्यांवर संवेदनशील होण्याची गरज असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत.
काठोड्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून पारधी जमातीचे नागरिक राहतात. येथील रहिवाशांनी मूलभूत सोय सुविधा उपलब्ध व्हाव्या अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष दिलं नाही. त्यामुळे इथल्या महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
गावातील महिलांना पाण्यासाठी शेजारच्या नदीवर जावं लागत आहे. १० फेब्रुवारीला गावातील काही महिला पाण्यासाठी नदीवर गेल्या. त्यांच्यासोबत वेदिका सुरेश चव्हाण ही १२ वर्षीय मुलगी देखील गेली होती. महिला कपडे धूत असताना वेदिकाचा पाय पाण्यात घसरला आणि तिचा बुडून मृत्यू झाला. तशा प्रकारचा अहवाल काठोडा ग्रामपंचायतीने तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
उन्हाळा सुरू झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात नागरिकांना पाणीटंचाईची समस्या भेडसावते. एरवीही पाण्यासाठी असा संघर्ष महिला करतातच. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे वेदिकाच्या वस्तीचा समावेश नरेंद्र मोदी सरकारची 'हर घर जल' ही महत्वकांक्षी योजनेत होता. भाषणांमधून सभा संमेलनातून सरकारची पाठ थोपटून घेताना ही योजना किती यशस्वी झाली, याचे गोडवे गायले जातात. प्रत्यक्षात लाखो-करोडो रुपये खर्च करूनही सर्वसामान्यांना पाणी प्यायला मिळत नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.