Maharashtra Weather saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: सतर्क रहा! राज्यात पुढील ५ दिवस धो-धो पावसाचे; ४ जिल्ह्यात रेड अलर्ट

Weather Update: राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. नाशिक आणि पुण्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Bharat Jadhav

हवामान विभागानं राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलीय. पुढील ५ दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. हवामान विभागाने आज पालघर, रायगड,भंडारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिलाय. तर कोकण आणि विदर्भातील वर्धा तसेच नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. विदर्भातील इतर जिल्हे, पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

उत्तर बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाखाली २४ आणि २५ रोजी ओडिशा २५ आणि २६ रोजी छत्तीसगड, २६ आणि २७ रोजी मध्य प्रदेश, २५ जुलै रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, विदर्भ आणि गंगीय पश्चिम बंगालमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईसाठी पुढील ३ ते ४ तास हे महत्वाचे असून मुंबईसह इतर परिसरात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

२७ जुलै रोजीही विदर्भात ऑरेंज अलर्ट तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. उथळ ठिकाणी पाणी साचत असल्यानं त्या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होतेय. भारतीय हवामान विभाग (IMD) ने अंदाज वर्तवला आहे की, २६ जुलै रोजी मुंबईतील हवामान "सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश आणि मुसळधार पावसाचे वातावरण राहील.

उद्या शनिवारी संपूर्ण विदर्भ, संपूर्ण कोकण, धाराशिव आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. चंद्रपूर, गोंदिया, पालघर आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील १६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

रेड अलर्टचा अर्थ:

IMD रेड अलर्ट जारी करतो, तेव्हा त्याचा अर्थ एखाद्या विशिष्ट भागात अतिवृष्टी, मुसळधार पाऊस किंवा ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.

ऑरेंज अलर्ट

ज्या भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा नागरिकांनाही आवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात.

यलो अलर्ट

हवामान खात्याकडून अनेक शहरांना बऱ्याच वेळा यलो अलर्ट दिला जातो. याचा अर्थ म्हणजे शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता असते. यामुळे नागरिकांच्या जनजीवनावरही परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT