Washim ZP Saam tv
महाराष्ट्र

Washim ZP : जिल्हा परिषद शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी कडक नियम; विनापरवानगी झेडपी आवारात दिसल्यास होणार कारवाई

Washim News : काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदचे सीईओ वैभव वाघमारे हे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकतात; असा आरोप करत यांच्या बदलीसाठी काम बंद आंदोलन पुकारलं होतं

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिम जिल्हा परिषदेने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कडक नियम लागू केले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या ११ ऑक्टोबरच्या आदेशानुसार यापुढे विनापरवानगी जिल्हा परिषदेत आलेल्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपिल नियम १९६४ अंतर्गत प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचे आदेशच काढले आहेत.

वाशिम (Washim) जिल्हा परिषदेने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कडक नियम लागू केले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या निर्देशानुसार यापुढे विनापरवानगी जिल्हा परिषदेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल. असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी (Zilha Parishad) जिल्हा परिषदचे सीईओ वैभव वाघमारे हे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकतात; असा आरोप करत यांच्या बदलीसाठी काम बंद आंदोलन पुकारलं होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. 

शाळा सोडून शिक्षक जिल्हा परिषदेत 

काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून शाळेच्या वेळेत कार्यालय सोडून जिल्हा परिषदेत येत असतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा सीईओ वैभव वाघमारे कर्मचारी विरुद्ध आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याला मिळाले नवीन मुख्यमंत्री; लोकभवनात पार पडला शपथविधी, 14 नवीन मंत्र्यांनी घेतली शपथ

Chanakya Niti: समोरच्या व्यक्तीच्या हावभावावरुन ओळखा त्याचं गुपित, चाणक्यांनी सांगितली सोपी ट्रीक

Maharashtra News Live Update: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सात जुलैला श्रीक्षेत्र देहूतून पंढरपूरकडे होणार प्रस्ताव....

Maharashtra Politics: भाजपमध्ये गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांची २ दिवसांत घरवापसी, नेमकं कल्याणमध्ये घडलं काय?

Government Order: सरकारनं कर्मचाऱ्यांवर लादले कडक नियम; जेवणासाठी घरी जाण्यास मनाई, परदेश दौऱ्यावरही बंदी

SCROLL FOR NEXT