Ekburji Dam Saam tv
महाराष्ट्र

Ekburji Dam: वाशीम शहराला पाणी टंचाईची शक्यता; एकबुर्जी धरण ८० टक्के पाणीसाठा

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशीम : पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला. मात्र, वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरण क्षेत्र परिसरात आणखी ही जोरदार (Rain) पाऊस न झाल्याने धरण केवळ ८० टक्केच भरले आहे. त्यामुळे पुढे पाऊस न पडल्यास (Washim) वाशिम शहराला  पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. (Latest Marathi News)

एकबुर्जी धरण हे मातीचे धरण असून या धरणाची निर्मिती १९६५ दरम्यान करण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या २५ हजार होती. आज वाशिम शहराची लोकसंख्या सव्वा लाखाच्या जवळपास आहे. सोबतच या धरणातील शेती सिंचनासाठी ५५ टक्के पाणीसाठा राखीव ठेवला जातो. हे धरण ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात १०० टक्के भरल्यानंतरही मे महिन्यात दहा ते बारा दिवसआड पाणी पुरवठा केला जातो. 

यंदा पावसाळ्याचा अडीच महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु धारण पाणलोट क्षेत्रात हवा तसा पाऊस झाला नसल्याने धरणातील पाणीसाठा अद्याप वाढलेला नाही. त्यामुळे पाऊस न पडल्यास वाशीम शहराला पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT