Ekburji Dam Saam tv
महाराष्ट्र

Ekburji Dam: वाशीम शहराला पाणी टंचाईची शक्यता; एकबुर्जी धरण ८० टक्के पाणीसाठा

Washim News वाशीम शहराला पाणी टंचाईची शक्यता; एकबुर्जी धरण ८० टक्के पाणीसाठा

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशीम : पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला. मात्र, वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरण क्षेत्र परिसरात आणखी ही जोरदार (Rain) पाऊस न झाल्याने धरण केवळ ८० टक्केच भरले आहे. त्यामुळे पुढे पाऊस न पडल्यास (Washim) वाशिम शहराला  पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. (Latest Marathi News)

एकबुर्जी धरण हे मातीचे धरण असून या धरणाची निर्मिती १९६५ दरम्यान करण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या २५ हजार होती. आज वाशिम शहराची लोकसंख्या सव्वा लाखाच्या जवळपास आहे. सोबतच या धरणातील शेती सिंचनासाठी ५५ टक्के पाणीसाठा राखीव ठेवला जातो. हे धरण ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात १०० टक्के भरल्यानंतरही मे महिन्यात दहा ते बारा दिवसआड पाणी पुरवठा केला जातो. 

यंदा पावसाळ्याचा अडीच महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु धारण पाणलोट क्षेत्रात हवा तसा पाऊस झाला नसल्याने धरणातील पाणीसाठा अद्याप वाढलेला नाही. त्यामुळे पाऊस न पडल्यास वाशीम शहराला पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT