लातूर - देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना लातूर (Latur) तालुक्यातील गाधवड येथे जवळपास 55 घराला लागून 10 फुटाच्या अंतरावर स्मशानभूमी तील जळणारी प्रेत आणि त्याच्या धूर आणि राखेपासून मुक्ती मिळावी म्हणून महिलांना मुलाबाळांसह उपोषण करावं लागत आहे.
लातूर तालुक्यातील गाधवड येथे तांदुळजा लातूर महामार्गावरील खंडोबा मंदिराच्या जवळच किमान 55 कुटुंब राहत आहेत. याच वस्तीत खंडोबा मंदिर आहे. त्याला लागूनच 20 गुंठे क्षेत्राची स्मशानभूमी निर्माण केली आहे. सदरील स्मशानभूमी ही काही गावगुंडांनी आणि राजकीय व्यक्तींनी अतिक्रमण करून केली आहे. यामुळे गावातील वातावरण दूषित होत आहे.
हे देखील पाहा -
याबाबत अनेकदा शासकीय कार्यालये, पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. या संदर्भात कोर्टात प्रकरण दाखल आहे. या स्मशानभूमीत प्रेत जाळल्यानंतर त्याची दुर्गंधी घरात पसरत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यत आले आहे. यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी होऊन शासकीय गायारानाची 20 गुंठे जमीन बहाल करण्यात आली असून हा निर्णय देण्यात आला आहे.
सदरील जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी जवळपास 20 महिला आणि पुरुषांनी उपोषणाचं हत्यार उपसले आहे. याप्रकरणी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी लक्ष घालून गोरगरीब नागरिकांना न्याय द्यावा यासाठी अनेकदा भेटी दिल्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही अखेरीस नागरिकांनी कंटाळून उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.