raosaheb danve  saam tv
महाराष्ट्र

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

दोघांचा वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत. बच्चू कडू आणि राणा यांच्या वादावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लक्ष्मण सोळुंके

Raosaheb Danve News : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. या दोघांच्या वादामुळे अमरावतीमधील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यांचा वादाचा परिणाम शिंदे गट आणि भाजप युतीवर देखील होत आहे. या दोघांचा वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत. बच्चू कडू आणि राणा यांच्या वादावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सध्या जालन्याच्या दौऱ्यावर आहेत. जालना-तिरुपती एक्सप्रेसच्या उदघाटनाप्रसंगी रेल्वे स्थानकावर आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, 'रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. ते दोघांना बसून वाद मिटवतील'.

दरम्यान, रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्याचा देखील खरपूस समाचार घेतला. नाना पटोले यांनी शिंदे सरकारमध्ये खदखद आहे. सरकारचा लवकरच अंत होणार आहे, असं वक्तव्य केलं होतं.पटोलेंना प्रत्युत्तर देताना दानवे म्हणाले, 'नाना पटोले (Nana Patole) यांचं वक्तव्य म्हणजे विरोधात गेल्यानंतर त्यांच्याकडील काही लोक आमच्याकडे येतील या भीतीने ते असं वक्तव्य करत आहेत. त्यामुळे राजकारणात अशा गोष्टी कराव्या लागतात'. अशा शब्दात समाचार घेत रावसाहेब दानवे यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्यावर मत स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT