परभणीमध्ये विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील बालाजीनगर भागात ही घटना घडली. टपरी बैलगाडीतून नेत असताना विजेचा धक्का लागला. त्यामुळे बैलगाडीत असणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परभणीत खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजीनगर येथील शेख शफीक शेख मुसा यांची पान टपरी होती. त्यांनी ती बैलगाडीतून घरी आणली. ही पान टपरी बैलगाडीतून खाली उतरण्यासाठी ६ जण आले. पान टपरी खाली उतवण्याचा प्रयत्न करत असताना ती खाली घसरली आणि त्याची लोखंडी दांडी विजेच्या तारेला लागली. त्यामुळे विजेचा धक्का लागून तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले.
या घटनेमध्ये सिद्धार्थ नरहरी बावळे (३५ वर्षे), शेख शफीक शेख मुसा (३१ वर्षे) आणि शेख शौकत शेख मुसा (४० वर्षे)या तिघांना विजेचा तीव्र धक्का बसून मृत्यू झाला. तर या घटनेत शेख फरहान शेख महेबूब (१६ वर्षे), अशोक शेखर शेख (१८ वर्षे) आणि शेख असलम शेख गुड्डू हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तर मृतांचे मृतदेह देखील शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमींवर लोहा येथील साई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पालम शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या परभणी पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.