यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस; दोघे गेले वाहून, एकाचा मृत्यू! संजय राठोड
महाराष्ट्र

यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस; दोघे गेले वाहून, एकाचा मृत्यू!

वणी तालुक्यातील राजूर-नांदेपेरा दरम्यान असलेल्या सोनापूर येथील सतीश देठे (वय 40), बालू उईके (वय 40), हे दोघे सोनापूर नाल्याच्या पुलावरून वाहून गेले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ: वणी Wani तालुक्यातील राजूर-नांदेपेरा दरम्यान असलेल्या सोनापूर येथील सतीश देठे (वय 40), बालू उईके (वय 40), हे दोघे सोनापूर नाल्याच्या पुलावरून वाहून गेले आहेत. सोमवारी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. रात्रभर दोघांचाही शोध सुरू होता. अखेर सतिश देठे यांचा सकाळी गावालगत मृतदेह Death Body आढळून आला. तर बालू उईके यांचा शोध सुरु आहे. सोमवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला होता.

हे देखील पहा-

नाल्याला पुर आल्याने सतीश देठे आणि बालू उईके यांनी दुचाकी Two Wheeler नाल्याच्या बाजूला लावली. आणि त्यांनी पूल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुराच्या Flood पाण्यात ते दोघेही वाहून गेले.

मृत सतिश देठे व बेपत्ता असलेले बालू उईके हे दोघेही शेती करत. सोमवारी ता. 30 ऑगस्ट रोजी कामानिमित्त ते दुचाकीने राजूर Rajur येथे गेले होते. रात्री 8 ते 8.30 वाजताच्या सुमारास ते परत येत होते. सोमवारी परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सोनापूर नाल्याला पूर आला होता. हा पुल सखल भागात असल्याने मुसळधार पाऊस Heavy Rain झाल्यास पुलावरून सुमारे 3 ते 4 फुट पाणी वाहत असते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT