Chief Minister Devendra Fadnavis reacts strongly after Congress leader Harshvardhan Sapkal comments on Tipu Sultan comparison row. saam tv
महाराष्ट्र

Tipu Sultan Controversy: टिपू सुलतानवरून शाब्दिक युद्ध पेटलं; CM फडणवीसांनी सपकाळांना ठणकावलं

Fadnavis Slams Harshvardhan Sapkal: टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्या विधानानंतर महाराष्ट्रात राजकीय वादळ उठलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सफकाळ यांना ठणकावलंय.

Bharat Jadhav

  • टिपू सुलतानच्या फोटोवरून राज्यात राजकीय वाद पेटला

  • हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे वाद तीव्र

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला

टिपू सुलतानच्या फोटोवरून राज्यातील राजकराणातील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटलंय. टिपू सुलतानला शिवरायाच्या समकक्ष पाहायला पाहिजे, असं म्हणणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच सुनावले आहे. मालेगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता. त्यानंतर वाद निर्माण झाला होता.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्याप्रकारे टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केली, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. त्यांना लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढाई करून स्वराज्याची निर्मिती केली. तर दुसरीकडे हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतान आहे. या दोघांना एकसमान आदर दिला जावा, अशी काँग्रेसची मागणी असेल, तर मतांच्या लांगूलचालनासाठी या लोकांनी कितीही बूट चाटले तरी महाराष्ट्र आणि देश अशा गोष्टी सहन करून घेणार नाही," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्याप्रकारे टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केली, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. त्यांना लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढाई करून स्वराज्याची निर्मिती केली. तर दुसरीकडे हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतान आहे. या दोघांना एकसमान आदर दिला जावा, अशी काँग्रेसची मागणी असेल, तर मतांच्या लांगूलचालनासाठी या लोकांनी कितीही बूट चाटले तरी महाराष्ट्र आणि देश अशा गोष्टी सहन करून घेणार नाही," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे- सपकाळ

"छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचं आहे. त्यांनी स्वराज्य नावाचा एक विचार ज्या पद्धतीने दिला, अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये त्यांच्यानंतर.. त्यांचा बराच कालावधी लोटल्यानंतर, त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता आणि त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. तर एक शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे," असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र

Shocking : व्हॅलेंटाईन डे आधी रूम बुक; बॉयफ्रेंडला भेटायला हॉटेलमध्ये गेली, काही वेळानं अचानक तरुणीनं बाल्कनीतून मारली उडी, नेमकं काय घडलं?

Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज, अभिषेक शर्माबाबत सूर्यकुमार यादवनं दिली महत्वाची अपडेट

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीला उपवासाला बनवा मऊसूत राजगिऱ्याचा शिरा, तोंडात टाकताच विरघळेल

'पप्पी घेणाऱ्या सोन्या'ने केलंय मार्केट जाम; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT