हे सरकार पाच वर्षे टिकणार- बच्चू कडू Saam Tv
महाराष्ट्र

हे सरकार पाच वर्षे टिकणार- बच्चू कडू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जयेश गावंडे

अकोला - आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप निर्माण झाला आहे. याबाबत सत्ताधारी महाआघाडीतील नेते आणि विरोधातील नेते वेगवेगळे बोलत आहे. This government will last for five years- Bachchu Kadu

परंतु, हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे, असा आत्मविश्वास राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज व्यक्त केला. भाजपमधील काही लोकांना भाजपमध्ये ठेवायचे असल्याने त्यांना ते स्टेटमेंट द्यावेच लागते असा टोला पालकमंत्री कडू यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

हे देखील पहा -

ते अकोला दौऱ्यावर असताना बोलत होते. त्यांना राज्यातील सरकार आणि राजकीय घडामोडी संदर्भात विचारणा केली असता, ते म्हणाले, बरेच लोक म्हणतात की हे सरकार टिकणार नाही. पण, याला काही अर्थ नाही. भाजपमधील काही लोकांना भाजपमध्येच ठेवायचे असल्याने त्यांना ते स्टेटमेंट द्यावेच लागते.

असं कोणी सांगणार आहे का की सरकार पाच वर्षे चालणार आणि आम्ही विरोधातच राहणार, असे सांगूच शकणार नाही. ते सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. अन सांगितलं तर भाजपला किती गळती होईल हे पण सांगता येत नाही. त्यामुळे किमान फुटू नये, यासाठी हा अपप्रचार चालू असते, असे ही ते म्हणाले.

सरकारला काही अस्थिरता येणार नाही. मला वाटतं अतिशय चांगलं काम विरोधक म्हणून त्यांनी आणि सत्ताधारी म्हणून आम्ही केलं पाहिजे. शेवटी लोकांच्या मनात आपल्या कर्तृत्वाने कसे उतरता येईल, ते पाहणे महत्वाचे आहे, असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले.

प्रताप सरनाईक यांचे पत्र आहे की बॉम्ब आहे, हे संशोधन करण्याची गरज आहे. प्रताप सरनाईक हे अतिशय खंदे शिवसैनिक आहेत. ते चांगले काम करतात. हे पत्र लिहून त्यांना नेमके काय समोर आणायचे आहे, हे अजूनही निश्चित होत नाही. त्याच्या मागचा उद्देश काय आहे, हे समजत नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला पाहिजे, असे पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT