भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय होणार मुंबईत SaamTvNews
महाराष्ट्र

Good News : भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय होणार मुंबईत

बेळगाव येथून चेन्नईला हलविलेले पश्चिम विभागीय कार्यालय महाराष्ट्र सरकारने जागा दिल्यास आपण मुंबई येथे सुरू करू, असे आश्वासन केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोग खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संतोष शाळीग्राम

नवी दिल्ली : बेळगावसह प्रयागराज, व कोलकाता पाठोपाठ आता लवकरच चेन्नई येथील केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय अपुऱ्या मनुष्यबळामुळे बंद करण्यात येणार आहे. पण, बेळगाव येथून चेन्नईला हलविलेले पश्चिम विभागीय कार्यालय महाराष्ट्र सरकारने जागा दिल्यास आपण मुंबई येथे सुरू करू, असे आश्वासन केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोग खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिले आहे.

हे देखील पहा :

नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील शिवसेना खासदार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय पूर्ववत बेळगाव येथे सुरू करावे, अशी मागणी करण्यासाठी आज नक्वी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले. खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय राऊत यांच्या शिष्टमंडळाने नक्वी यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, धनंजय पाटील, पीयूष हावळ उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kale Mani Mangalsutra: 'महाराष्ट्रीयन अस्सल पारंपारिक दागिना' काळे मनी मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट पॅटर्न

Viral Video: साडीला लटकवून खाली उतरवलं आणि...! 200 रूपयांच्या कपड्यांसाठी मुलाचा जीव घातला धोक्यात, पाहा Video

Actor Death: ना कोणता आजार, ना काही त्रास; साऊथ सुपरस्टारच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला धक्का

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना रखडलेले हप्ते मिळणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाँग मार्चला सुरुवात, राजूर ते अहिल्यानगरपर्यंत जाणार मोर्चा

SCROLL FOR NEXT