Maharashtra-Karnataka Border Dispute News Saam TV
महाराष्ट्र

Belagav Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर दोन्ही राज्याच्या राज्यपालांची कोल्हापूरात होणार ऐतिहासिक भेट

Maharashtra-Karnataka Border Dispute News: महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील राज्यपालांच्या बैठकीनंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचीही लवकरच होणार बैठक होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Kolhapur Latest News: महाराष्ट्र-कर्नाटक वादाबाबत आता केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. बेळगाव सीमाप्रश्न आणि दोन्ही राज्यातील वाद (Maharashtra-Karnataka Border Dispute) यांच्याबाबत चर्चा करण्यासाठी आज, शुक्रवारी कोल्हापूरात (Kolhapur) ऐतिहासिक बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांची बैठक होणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील राज्यपालांच्या बैठकीनंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचीही लवकरच बैठक होणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील तेढ संपवण्याच्या दृष्टीने आजची बैठक ही ऐतिहासिक ठरणार आहे. (Kolhapur Today News)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनंतर दोन्ही राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ही बैठक होणार आहे. दोन्ही राज्यातील सीमावादावर न्यायालयात न्यायालयीन लढाई सुरू आहे. पण, निकाल लागेपर्यंत दोन्ही राज्यातील कटूता दूर करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी ही पावले उचलली आहेत.

या बैठकीला दोन्ही राज्याचे राज्यपाल तसेच सीमा भागातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी सहभागी होणार आहेत. तसेच दोन्ही राज्यातील सीमा भागातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी काल रात्रीच कोल्हापुरात दाखल झाले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकची अशाप्रकारे व्यापक आणि संयुक्त बैठक याआधी कधीच झाली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, रेसिडेन्सी क्लबमध्ये सकाळी ११ ते १ या वेळेत होणाऱ्या बैठकीत या भागांतील अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न दोन्ही राज्यांकडून केला जाणार आहे. अलमट्टी धरणात पाणी अडवल्यानंतर त्याच्या पुराचा फटका कोल्हापूर आणि सांगली बसतो, या धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने पुढे आणला आहे. मात्र याला महाराष्ट्र सरकारने तीव्र विरोध दर्शवला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराला कारणीभूत असलेल्या अलमट्टी धरणाची पाणीपातळी, आजरा तालुक्यातील किटवडे प्रकल्प, गोवा राज्यातून अवैध पद्धतीने होणारी दारू वाहतूक, लम्पी रोग, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, सीमाभागातील विद्यार्थ्यांचे दाखले, कर्नाटकातून येणारे हत्ती, करोना काळातील अनुदान, गर्भलिंग निदान चाचणी अशा विविध समस्यांसंदर्भात या विषयावरही बैठकीत चर्चा होणार आहे.

घटनातज्ज्ञ उल्हास बापट काय म्हणाले?

याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले की, सीमा प्रश्नावर केंद्राला राज्यपालांनी फीडबॅक देणं महत्त्वाचं आहे. अर्थात निर्णय मात्र केंद्र सरकारच घेणार. याबाबत राज्यांना विचारलं जाऊ शकतं. राज्यांच्या म्हणण्याला अर्थ नाही, निर्णय केंद्राचा असेल त्या दृष्टीने ही भेट महत्वाची आहे. या भेटीचा अहवाल केंद्र सरकारला दिला जाईल असंही उल्हास बापट म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT