Raigad News Saam TV
महाराष्ट्र

Raigad News : 'सोन्‍यासारखी मुलं सोडून जाताना वेदना होतात, सरकारला आता तरी कळेल का?' आर्थिक विवंचनेतून शिक्षकाची आत्‍महत्‍या

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Raigad News :

आर्थिक विवंचनेतून शिक्षकाने विष पित आपलं जीवन संपलं आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. महादेव जानू वारगुडे असे त्या शिक्षकाचे नाव आहे.

वेतन वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेमुळे हे वारगुडे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्‍याचे त्यांना सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून समोर आलं आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी राज्य व केंद्र सरकारला दोष दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तासिका कर्मचाऱ्यांना लवकर कायम करा, अन्यथा पगारात वाढ करा, नायतर माझ्यासारखी प्रत्‍येकावर ही परिस्थिती यायला वेळ लागणार नाही. माझी सोन्‍यासारखी मुलं सोडून जाताना काय वेदना होतात, हे सरकारला आता तरी कळणार आहे की नाही, असा सवाल देखील त्‍यांनी उपस्थित केला आहे. (Live Marathi News)

सोशल मीडिया पोस्ट

'तासिका कर्मचाऱ्यांना लवकर कायम करा, पगारात वाढ करा. नाहीतर माझ्यासारखी वेळ इतरांवर यायला वेळ लागणार नाही. माझी सोन्यासारखी मुलं सोडून जाताना काय वेदना होतात, हे सरकारला आतातरी कळणार आहे की नाही? अजून खूप जगावसं वाटत होतं. पण वेळेवर पगार नाही, जगावं कसं हेच कळत नाही. मला माफ करा मी माझी मुलं अर्ध्यात सोडून जात आहे.'

'थोडं संघर्ष करुन जगायजं होतं, पण मन आतून पूर्णपणे तुटलेलं आहे. हे सरकार सर्वसामान्य माणसाला जगू देणार नाही. हेच का अच्छे दिन. नाय तिथे खर्च आणि आमचे पगार वेळेवर द्यायला पैसे नाही. अनुराज सॉरी बाळा. मिस यू.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT