ravikant tupkar 
महाराष्ट्र

शेतक-यांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा करा : रविकांत तुपकर

संजय जाधव

बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे buldhana rain हातात आलेल्या पीक शेतक-यांच्या डाेळ्या देखत वाहून गेले आहे. दरम्यान शेतकरी वर्गास या संकटातून तातडीने बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये शेतक-याच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर ravikant tupkar यांनी येथे केली आहे. swabhimani-shetkari-sanghtana-leader-ravikant-tupkar-demands-to-declare-wet-drought-in-maharashtra-sml80

तुपकर म्हणाले राज्यात अतिवृष्टीमुळे माेठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. जर सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यास मंत्री, आमदार व खासदारांचे वेतन काही काळासाठी थांबवावे अथवा रद्द करावेत असे तुपकरांनी नमूद केले. ते म्हणाले कंपन्यांकडून सीएसआर निधी जमा करावा मात्र शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी तुपकर यांनी केली आहे.

तुपकर यांनी बुलडाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. दरम्यान वीज वितरण कंपनीने थकबाकीदारांचे वीज कनेक्शन ताेडण्यास सुरुवात केली आहे. हे चुकीचे असल्याचे रवीकांत तुपकर यांनी नमूद केले. वीज वितरण कंपनीने हा प्रकार थांबवावा अन्यथा स्वाभिमानी जशास तसे उत्तर देईल असा इशारा देखील तुपकर यांनी दिला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT