अहमदनगर - संगमनेर येथील भाऊसाहेब संतूजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या राहुरी फॅक्टरी येथील उपविभागीय कार्यालयातील कामगारांना कोंडून घेऊन कार्यालयातील दप्तर जाळत एफआरपी प्लस 300 रुपये प्रमाणे भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील कामगारांना कोंडून घेत कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन केलं.
हे देखील पहा -
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कारखान्यांनी आपले भाव जाहीर केले आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांनी भाव जाहीर केले नसल्याने स्वाभिमानी संघटनेने टाळे ठोक आंदोलन सुरू केले आहे. आज प्राथमिक स्वरूपात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यात असलेला भाऊसाहेब संतूजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या राहुरी फॅक्टरी येथील उपविभागीय कार्यालयात कामगारांना कोंडून घेऊन कार्यालयातील दप्तर जाळून आंदोलन केले.
यावेळी संबंधित कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांची मुदत दिली असल्याने तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन मागे घेण्यात आल आहे. मात्र, हे आंदोलन असेच सुरू राहणार असून जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपी प्लस 300 रुपये भाव जाहीर करावा अन्यथा जिल्ह्यातील कोणत्याच मंत्र्याला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, कारखाने देखील सुरळीत चालू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.