Jayant Patil  Saam Tv
महाराष्ट्र

सुरेश लाड यांनी राजीनामा दिलेला नाही; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

लाड यांच्या राजीनामा नाट्यावर प्रदेशाध्यक्ष यांनी पडदा टाकला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड (Suresh lad) यांनी कोणताही राजीनामा दिलेला नाही. असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिले आहे. त्यामुळे लाड यांच्या राजीनामा नाट्यावर प्रदेशाध्यक्ष यांनी पडदा टाकला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर एकमेकाला समजून घेतले तर आघाडी चांगली होईल. आघाडीतील नेत्याने जिल्ह्यात पचवून घेणेही गरजेचे आहे. असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

हे देखील पहा -

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन जिल्ह्यात तीन दिवस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सुरू आहे. कर्जत येथे कार्यकर्ता परिसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी पाठ फिरवली होती. मेळाव्या दरम्यान लाड यांनी आपला पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांना पाठविला होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र सुरेश लाड यांनी कोणताही राजीनामा दिलेला नाही. उरण, पनवेल येथील कार्यक्रमात ते होते. त्याची मुलगी, भाऊ हे सुद्धा मेळाव्यात हजर असल्याचे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरून हटविण्यासाठी शिवसेना आमदारांनी आवाज उठविला होता. राज्यात तीन पक्षाचे सरकार असून आघाडीतील नेत्यांनी पचवून घेणे गरजेचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर एकमेकांनी समजून घेतले तर आघाडी चांगली होऊन यश मिळू शकते असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : फक्त ५ मिनिटांत बनवा 'हे' हेल्दी पुडिंग, वजन कमी करण्यासाठी ठरेल फायदेशीर

Crime news: पत्नीचं दुसरीकडे अफेअर, पतीची दिली सुपारी; नवऱ्याचा मृत्यू झाल्याचं समजून प्रियकराला केले १०० पेक्षा जास्त फोन आणि...!

Maharashtra News Live Update: रायगडच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

रेकॉर्डब्रेक मतदान! पश्चिम बंगालमध्ये ९० टक्के व्होटिंग; सत्ता बदलणार की ममता बॅनर्जी पुन्हा येणार?

SCROLL FOR NEXT