ऐन सणासुदीत साखरेचे भाव गगनाला भिडल्यानं सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागतोय. एव्हंढच नाही तर राज्यात साखरेचे दर पुढील काळात शंभरी पार जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरात साखरेच्या किंमती जवळपास २५ टक्क्यांपर्यंत वाढल्यात. त्यामुळे राज्यात साखऱेचे दर 80 रुपयांवर पोहोचलेत. तर दुसरीकडे, साखरेची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं 10 लाख टन साखर आयात करण्याला नुकतीच परवानगी दिलीये. देशात साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये म्हणून सरकारनं व्यापाऱ्यांवर साठा मर्यादा लागू केलीये. त्यामुळे देशात साखरेची नेमकी स्थिती काय आहे पाहूयात...
साखरेची स्थिती
राज्यातील शिल्लक साखर
18 लाख टन
राज्याला दरमहा साखरेची गरज
3 लाख टन
देशातील शिल्लक साखर
54 लाख टन
देशाला दरमहा साखरेची गरज
20 लाख टन
देशात साखरेसंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीला अनेक जणांनी इथेनॉलला जबाबदार धरलंय. इतकंच नव्हे तर इथेनॉलच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. भारत हा जगातला साखरेचा दोन नंबरचा निर्यातदार आहे. तरीही भारतावर साखर आयात करण्याची नामुष्की ओढवलीय. आयात केलेली साखर ऑक्टोबरमध्ये देशात येणार असल्याचा अंदाज आहे. त्यात देशातील 30 टक्के ऊस इथेनॉल तयार करण्यासाठी वापरला जातोय. या हंगामात जवळपास 31 लाख टन साखरेइतकं उत्पादन इथेनॉलकडे वळवलं गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात साखर शंभरीपार जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.