सोलापूरात वीज तोडणी प्रश्न ऐरणीवर; डीपीडीसी बैठकीत एकच हल्लाबोल विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

सोलापूरात वीज तोडणी प्रश्न ऐरणीवर; डीपीडीसी बैठकीत एकच हल्लाबोल

कोरोना काळातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारात भ्रष्टाचार, आमदार राम सातपुते यांचे आरोप

विश्वभूषण लिमये

सोलापूर - काल उशिरापर्यंत चाललेल्या डिपीडीसी अर्थात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गदारोळ झाला. शेतकऱ्यांची वीज तोडणी आणि कोरोना काळातील कर्मचाऱ्यांच्या पगारातील भ्रष्टाचार हे दोन विषय प्रामुख्याने गाजले, भ्रष्टाचार चौकशीसाठी सीबीआयला पत्र लिहिणार असल्याचे आमदार राम सातपुते यांनी सांगताच सभेचे अध्यक्ष पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे चांगलेच भडकले.

हे देखील पहा -

तर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये. याबाबत ऊर्जा मंत्र्याना भेटून मागणी करण्यात येणार आहे. सध्या ऊस तोडणी हंगाम जवळ आला आहे. वीज कनेक्शन जोडणी न झाल्यास याचा शेतकऱ्यांना फटका बसू शकतो असे मत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले आहे.

सोलापूर येथे डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदार संजय शिंदे, आमदार समाधान अवताडे, आमदार राम सातपुते आदींनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन एमएसईबी कडून तोडली जात आसल्याबाबत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी मागणी करण्यात आली. या बाबतीत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेवून त्यांना याचे निवेदन देऊन तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकून ट्रकचा चक्काचूर, केबिनमध्ये अडकला ड्रायव्हरचा मृतदेह

Tata Sierra: टाटा सिएरासाठी विक्रमी मागणी, पहिल्या दिवशी ७०,०००पेक्षा जास्त ऑर्डर्स, वाचा खास वैशिष्ट्ये

Dhananjay Munde: मंत्रीपदासाठी फिल्डिंग; इकडे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, तिकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी

Maharashtra Live News Update: शिर्डी पुन्हा हादरली; भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत वाद उफाळणार; चित्रा वाघ यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT