Sharad Pawar's initiative to bring back students stuck in Manipur,
Sharad Pawar's initiative to bring back students stuck in Manipur,  saam tv
महाराष्ट्र

Students stuck in Manipur Violence: मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पवारांचा पुढाकार, गृहमंत्र्यांना केला फोन

Chandrakant Jagtap

>> सुरज मसुरकर

Sharad Pawar's initiative for students in Manipur: मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. पवारांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुध्वणीवरून संपर्क साधला आणि मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणण्याची विनंती केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील पवारांना विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्याचे अश्वासन दिले.

मणिपूरमध्ये संध्या हिंसाचार भडकला आहे. या हिंसाचारादरम्या तेथीलव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वसतीगृहात महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्याची विनंती पवार यांनी केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खासगी विमान पाठवून या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणलं जाईल असे अश्वासन दिले.

मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी सपर्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंगळुरू येथून मणिपूरमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यातील 14 मराठी विद्यार्थ्यांना मणिपूर येथील शिवसेना भवनात सुखरूप आणण्यात आले असून त्यांना खायला अन्न आणि बाकीच्या वस्तू देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित 8 विद्यार्थ्यांना लवकरच याठिकाणी आणण्यात येणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.

तसेच शिवसेनेचे मणिपूर राज्य प्रमुख टोम्बी सिंह यांनी चांगली सोय केल्याचेही सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना ते सुखरूप आहेत का? अशी विचारले तेव्हा विद्यार्थ्यांनी आम्ही सर्व सुखरूप आहोत असे सांगून एवढ्या तत्परतेने मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

काही भागात तणावपूर्ण शांतात

मणिपूरमधील हिंसाचारानंतर (Manipur Violence) अनेक भागात परिस्थिती नियंत्रणात आहे. चुरचंदपूर जिल्हा आणि आसपासच्या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे अनेक भागात संचारबंदीमध्ये काहीशी शिथिलता जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकार आणि विविध भागधारकांमध्ये झालेल्या चर्चेनंतर आज सकाळी ७ ते १० या वेळेत या सवलती देण्यात आल्या आहेत.

हिंसाचारात आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू

मणिपूरमध्ये जातीय हिंसाचारामुळे आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की अधिकृत मृतांची संख्या 54 आहे, त्यापैकी 16 मृतदेह चर्चंदपूर जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत, तर 15 मृतदेह इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय विज्ञान संस्थेत ठेवण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Federation Cup: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचा धमाका, फेडरेशन कपमध्ये जिंकलं सुवर्णपदक

Maharashtra Politics: प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

Suzuki Jimny चा नवीन 5 डोअर एडिशन लॉन्च, मिळत आहे 1.50 लाखांपर्यंत सूट

Lok Sabha Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा?

Khatron Ke Khiladi 14: 'खतरों के खिलाडी १४'मध्ये कोण- कोण सेलिब्रिटी दिसणार? पाहा लिस्ट...

SCROLL FOR NEXT