water logged  
महाराष्ट्र

वाहन काेसळताच गावक-यांनी घेतली धाव; सात जणांचे वाचविले प्राण

राजेश काटकर

परभणी : परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामधील पिंपळगाव नजीक असलेल्या नदीवरील पुलावरून एका चार चाकी मंगळवारी रात्री पडली. दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पूलावर माेठ्या प्रमाणात पाणी साचले water logged हाेते. त्याचा अंदाज चालकास न आल्याने ही घटना घडली. दरम्यान ग्रामस्थांनी वेळीच धाव घेतल्याने वाहनातील सात प्रवाशांचा जीव वाचला.

पाथरी तालुक्यातील बाबळगाव ते वाघाळा फाटा या रस्त्यावर असलेल्या नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली हाेती. मंगळवारी रात्री पुलावरून पाणी वाहत असताना वाहन चालकाने वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह माेठा हाेता. त्यातच पूलाला कठडे नाहीत. त्यामुळे नेमके पाणी काेठे आहे आणि रस्ता काेठे याचा अंदाज येत नाही.

नेमके तसेच चालकाच्या बाबतीत झाले. त्याने वाहन पुढं नेण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन पुलावरुन खाली काेसळले. हा प्रकार परिसरातील ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या वाहनातील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. रात्रीच्या अंधारत गावकऱ्यांनी माणुसकीतून केलेल्या मदतीचे प्रवाशांनी आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT