water logged  
महाराष्ट्र

वाहन काेसळताच गावक-यांनी घेतली धाव; सात जणांचे वाचविले प्राण

राजेश काटकर

परभणी : परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामधील पिंपळगाव नजीक असलेल्या नदीवरील पुलावरून एका चार चाकी मंगळवारी रात्री पडली. दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पूलावर माेठ्या प्रमाणात पाणी साचले water logged हाेते. त्याचा अंदाज चालकास न आल्याने ही घटना घडली. दरम्यान ग्रामस्थांनी वेळीच धाव घेतल्याने वाहनातील सात प्रवाशांचा जीव वाचला.

पाथरी तालुक्यातील बाबळगाव ते वाघाळा फाटा या रस्त्यावर असलेल्या नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली हाेती. मंगळवारी रात्री पुलावरून पाणी वाहत असताना वाहन चालकाने वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह माेठा हाेता. त्यातच पूलाला कठडे नाहीत. त्यामुळे नेमके पाणी काेठे आहे आणि रस्ता काेठे याचा अंदाज येत नाही.

नेमके तसेच चालकाच्या बाबतीत झाले. त्याने वाहन पुढं नेण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन पुलावरुन खाली काेसळले. हा प्रकार परिसरातील ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या वाहनातील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. रात्रीच्या अंधारत गावकऱ्यांनी माणुसकीतून केलेल्या मदतीचे प्रवाशांनी आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT