Dhananjay Mahadik And Satej Patil Saam TV
महाराष्ट्र

'जे काय करायचं ते रणांगण आल्यावर...'; धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर सतेज पाटलांची प्रतिक्रिया

'कोल्हापूरचा विकास करणं आणि कोल्हापूरला पुढे घेऊन जाणं हे आमचं ठरलंय'

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : रणांगण आल्यावरच जे काय आहे ते करायचं ही माझी सवय आहे. असं म्हणत काँग्रेसचे नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या राज्यसभा निवडणुकीतील विजयावर पहिल्यादाच प्रतिक्रिया दिली आहे.

जिल्हा परिषद, महापालिका निवडणूका अजुन लांब आहेत, सगळ्याच निवडणुका अजून लांब आहेत, ज्यावेळी प्रत्यक्ष लढाई असते त्यावेळी आम्ही त्या निवडणुकीत कसं उतरतो हे सगळ्यांनाच माहीत आहे.

कोल्हापूरचा (Kolhapur) विकास करणं आणि कोल्हापूरला पुढे घेऊन जाणं हे आमचं ठरलंय, असंही सतेज पाटील म्हणाले. सांगली शहरातील झुलेलाल चौक येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग या नामफलकाचे अनावरण सतेज पाटील (Satej Patil) यांच्या हस्ते झाले यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

हे देखील पाहा -

यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यसभेच्या अनुभवातून आम्ही काही गोष्टी शिकलोय, विधान परिषदेमध्ये कुठेही दगाफटका होणार नाही. महाविकास आघाडीचे सगळे आमदार विधान परिषदमध्ये आमच्या बरोबर राहतील असा मला विश्वास आहे असंही पाटील म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिनेत्री ऊर्फी जावेदने मुस्लिम धर्म सोडला? आता कोणता धर्माचं पालन करतेय? VIDEO

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरला, भाजपच्या मंत्र्याची राजधानीत घोषणा

Maharashtra Live News Update: अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतले शैक्षणिक पालकत्वं

Maharashtra Politics: विलिनीकरणावरून वाद पेटला; अजित पवार गटाच्या आमदाराचा शरद पवार गटावर हल्लाबोल

मोठी बातमी! भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही, कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT