Sarpanch Agitation 
महाराष्ट्र

कोरोनाचे नियम पायदळी; साताऱ्यात सरपंच परिषदेचा कंदील मोर्चा

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्ह्यातील सरपंच परिषद यांच्या वतीने आज (शुक्रवार) साताऱ्यात कंदील मोर्चा काढण्यात आला. आंदाेलकांनी हातात कंदील घेऊन पोवई नाक्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महावितरणाच्या विराेधात घाेषणा देत माेर्चा काढला. (sarpanch-parishad-agitation-mahavitran-satara-news)


वीज बिल न भरल्याने जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये असणारे पथदिवे (स्ट्रीट लाईट) महावितरण विभागाने बंद केल्या आहेत. त्यामुळे गावागावात रात्रभर अंधाराचे साम्राज्य असते. पथदिवे चालू कराव्यात आणि प्रत्येक ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठ्याचे वीजबिल माफ करावे या दोन प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा हाेता असे आंदाेलकांनी सांगितले.

यावेळी हातात कंदील घेऊन तसेच वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेऊन सातारा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान जमलेल्या गर्दीमुळे कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले गेले. त्यामुळे पोलिस आणि मोर्चेकर्यांच्या मध्ये वादावादी देखील झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

Ration Card New Rule: अंत्योदय अन्न योजनेत मोठा बदल; आता रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल ७ किलो धान्य

Kalyan : बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेप्रकरणी विधानसभेतील माहिती दिशाभूल करणारी; महाथेरो गौतम रत्न यांचा आरोप

Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT