Sarpanch Agitation 
महाराष्ट्र

कोरोनाचे नियम पायदळी; साताऱ्यात सरपंच परिषदेचा कंदील मोर्चा

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्ह्यातील सरपंच परिषद यांच्या वतीने आज (शुक्रवार) साताऱ्यात कंदील मोर्चा काढण्यात आला. आंदाेलकांनी हातात कंदील घेऊन पोवई नाक्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महावितरणाच्या विराेधात घाेषणा देत माेर्चा काढला. (sarpanch-parishad-agitation-mahavitran-satara-news)


वीज बिल न भरल्याने जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये असणारे पथदिवे (स्ट्रीट लाईट) महावितरण विभागाने बंद केल्या आहेत. त्यामुळे गावागावात रात्रभर अंधाराचे साम्राज्य असते. पथदिवे चालू कराव्यात आणि प्रत्येक ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठ्याचे वीजबिल माफ करावे या दोन प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा हाेता असे आंदाेलकांनी सांगितले.

यावेळी हातात कंदील घेऊन तसेच वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेऊन सातारा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान जमलेल्या गर्दीमुळे कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले गेले. त्यामुळे पोलिस आणि मोर्चेकर्यांच्या मध्ये वादावादी देखील झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stray Dog Attack : भटक्या कुत्र्यांची दहशत कधी थांबणार? संभाजीनगरमध्ये चिमुरड्याचे लचके तोडले अन्...

Maharashtra Weather: राज्यावर अवकाळीचं संकट! ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज, ११ जिल्ह्यांना इशारा; बळीराजा चिंतेत

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात दाखल

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? संभाव्य तारीख आली समोर

Kadhi Pakoda Recipe : कढी पकोडा संडे स्पेशल मेन्यू; 'ही' रेसिपी फॉलो करा कढी अजिबात फुटणार नाही

SCROLL FOR NEXT